शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

लोकांनी परिवर्तनाचा मूड तयार केलाय, काँग्रेसला निरोप देण्याचं ठरवलंय - अमित शाह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 12:27 IST

राजस्थानच्या लोकांनी परिवर्तनाचा मूड तयार केला आहे. लोकांनी काँग्रेसला निरोप देण्याचे ठरवले आहे, असे अमित शाह म्हणाले.

जयपूर : राजस्थान विधानसभेच्या मतदानाचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राजस्थानमध्ये पुढील सरकार भाजपचे स्थापन होणार आहे. राजस्थानच्या लोकांनी परिवर्तनाचा मूड तयार केला आहे. लोकांनी काँग्रेसला निरोप देण्याचे ठरवले आहे, असे अमित शाह म्हणाले.

राजस्थानच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील लोकांनी परिवर्तनाचा मूड तयार केला आहे. राजस्थानच्या जनतेने प्रत्येक क्षेत्रात अपयशी आणि अपयशी ठरलेल्या काँग्रेस सरकारला निरोप देण्याचे मन बनवले आहे. मी संपूर्ण राजस्थानचा दौरा केला आहे. त्यामुळे मी आत्मविश्वासाने सांगू इच्छितो की, राजस्थानमध्ये पुढील सरकार भाजपचेच स्थापन होईल. केंद्रातील भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारने राजस्थानमधील कोट्यवधी लाभार्थ्यांना केंद्रीय योजनांचा थेट लाभ पारदर्शक पद्धतीने दिला आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. तसेच, राजस्थान नेहमीच मोदीजींच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि भाजपला पाठिंबा दिला आहे. राजस्थानच्या जनतेने लोकसभेच्या २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपला सर्व जागा देऊन मोदीजींना नेहमीच पाठिंबा दिला आहे, असे अमित शाह म्हणाले. 

याचबरोबर, अमित शाह यांनी राजस्थानमधील काँग्रेस सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, सालासर येथील राम दरबारावर बुलडोझर चालवण्यात आला. अलवरमधील शिवलिंग ड्रिलिंग मशीनने फोडले. काठुमारमध्ये गोठ्यावर बुलडोझर फिरवला, अशा तुष्टीकरणाची अनेक प्रकरणे राजस्थानमध्ये पाहायला मिळाली आहेत. गेहलोत सरकारमध्ये तुष्टीकरणाचे राजकारण शिगेला पोहोचले आहे. गेल्या ५ वर्षांत छाबरा, भिलवाडा, करौली, जोधपूर, चित्तोडगड, नोहर, मेवात, मालपुरा, जयपूर येथे नियोजित दंगली झाल्या. व्होट बँकेच्या राजकारणामुळे गेहलोत सरकारने दंगलखोरांवर कोणतीही ठोस कारवाई केली नाही, असेही अमित शाह म्हणाले.

दरम्यान, राजस्थानमध्ये प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजपमध्ये लढल्या जात असलेल्या निवडणुकीच्या प्रचारात अनेक राष्ट्रीय व स्थानिक मुद्द्यांवर भर दिला जात आहे. परंतु संपूर्ण निवडणूक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याभोवतीच केंद्रित झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ही भाजपसाठी राजस्थानसह अन्य राज्यांमध्ये मोठी ताकद मानली जात आहे, दुसरीकडे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे त्यांनी राबविलेल्या कल्याणकारी योजना आणि गॅरंटीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी वसुंधराराजे यांचे नाव जाहीर केले नसले, तरी सध्या त्यांच्याच नावाची चर्चा राज्यातील मतदारांमध्ये  सुरू आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहRajasthanराजस्थानRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूक