शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

उत्तराखंडनंतर राजस्थानमध्ये UCC आणण्याची तयारी; कॅबिनेट मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 19:21 IST

उत्तराखंडच्या पुष्करसिंह धामी सरकारने आज विधानसभेत समान नागरी कायदा विधेयक सादर केले.

Uttarakhand UCC :उत्तराखंड राज्यात पुष्करसिंह धामी सरकारने आज विधानसभेत समान नागरी कायदा (UCC) विधेयक सादर केले. यानंतर आता राजस्थानमध्येही हे आणण्याची चर्चा सुरू झाली आहे. राजस्थानचे कॅबिनेट मंत्री कन्हैया लाल चौधरी यांनी सांगितले की, आम्ही UCC लागू करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठी तयारीही सुरू झाली आहे. यूसीसी आणल्याबद्दल त्यांनी उत्तराखंड सरकारचे अभिनंदनही केले.

कॅबिनेट मंत्री कन्हैया लाल चौधरी म्हणाले की, यूसीसी आणणारे उत्तराखंड पहिले राज्य ठरले, त्यांचे अभिनंदन. आम्हीही UCC लागू करण्याची तयारी करत आहोत. UCC भारतात खूप महत्वाचे आहे. देशात एकच कायदा चालेल, दोन नाहीत. मुख्यमंत्र्यांशी बोलून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणूक जिंकून भाजप राजस्थानमध्ये सत्तेवर आला. यानंतर भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री करण्यात आले. भाजप सरकार परत आल्यापासून राजस्थानमध्ये यूसीसीची चर्चा आणि मागणी सुरू झाली. भजनलाल सरकारमधील अनेक मंत्र्यांचे असे मत आहे की, राज्यात यूसीसी खूप महत्त्वाचे आहे.

उत्तराखंड विधानसभेत UCC विधेयक सादर उत्तराखंडच्या पुष्करसिंह धामी सरकारने आज म्हणजेच मंगळवारी विधानसभेत UCC विधेयक सादर केले. आता या विधेयकावर चर्चा होऊन ते मंजूर करण्यासाठी मतदान होणार आहे. विधानसभेत भाजप बहुमतात आहे, त्यामुळे या अधिवेशनातच विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे. विधेयक मंजूर झाल्यानंतर ते राज्यपालांकडे पाठवले जाईल.

या विधेयकात काय आहे?UCC अंतर्गत सर्व धर्मातील मुलींच्या लग्नाचे किमान वय 18 वर्षे असेल.स्त्री-पुरुषांना घटस्फोटाचा समान अधिकार मिळेल.लिव्ह इन रिलेशनशिप घोषित करणे आवश्यक आहे.लिव्ह-इन नोंदणी न केल्यास 10,000 रुपये दंड आकारला जाईल.लिव्ह-इन मॅरेजमध्ये जन्मलेल्या मुलांना मालमत्तेत समान अधिकार असतील.स्त्रीला पुनर्विवाह करण्यासाठी कोणत्याही अटी नाही.बहुपत्नीत्वावर बंदी, पती-पत्नी जिवंत असताना दुसरा विवाह होऊ शकत नाही.मुलींना वारसाहक्कात समान हक्क मिळेल. इत्यादी...

विधानसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर आणि राज्यपालांकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर, देवभूमी उत्तराखंड हे UCC लागू करणारे देशातील पहिले राज्य असेल. मिळालेल्या माहितीनुसार, मसुद्यात 400 हून अधिक विभाग आहेत, ज्याचा उद्देश पारंपारिक रीतिरिवाजांमुळे उद्भवणाऱ्या विसंगती दूर करणे हा आहे. धामी सरकारने UCC वर लोक आणि तज्ञांची मते गोळा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. या समितीने नुकताच आपला अहवाल सरकारला सादर केला, त्यानंतर आता सरकारने हे विधेयक विधानसभेत मांडले आहे. 

टॅग्स :Uniform Civil Codeसमान नागरी कायदाUttarakhandउत्तराखंडRajasthanराजस्थानBJPभाजपा