शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

रत्नागिरीत कागदावर २० टक्के तर प्रत्यक्षात ५० टक्के पाणीकपात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 6:48 PM

रत्नागिरी एमआयडीसीकडून ग्रामपंचायतींना होणाºया पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात ५० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. त्यामुळे कुवारबाव, कर्ला, नाचणे, शिरगाव, मिºया, मिरजोळे या ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजनांचे तीनतेरा वाजले आहेत.

 रत्नागिरी - रत्नागिरी एमआयडीसीकडून ग्रामपंचायतींना होणाºया पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात ५० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. त्यामुळे कुवारबाव, कर्ला, नाचणे, शिरगाव, मिºया, मिरजोळे या ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजनांचे तीनतेरा वाजले आहेत. २० टक्क्यांची कपात ५० टक्क्यांवर कशी गेली, याबाबत सोमवारी आमदार उदय सामंत यांनी एमआयडीसीच्या येथील अधिकाºयांना धारेवर धरले. तसेच कपातीइतकेच पाणी कमी असेल. त्यापेक्षा पाणीकपात चालणार नाही, असा इशाराही अधिकाºयांना यावेळी देण्यात आला. 

एमआयडीसी तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजनांना पाणीपुरवठा करीत आहे. यावेळी हरचेरी धरणात पाण्याची उपलब्धता असल्याचे पुढे येत आहे. याठिकाणी फारशी पाणीपातळी घसरलेली नाही. मात्र, असे असतानाही पाणीकपात का केली व कोणाच्या सांगण्यावरून केली, असा प्रश्नही आमदार सामंत यांनी यावेळी अधिकाºयांना केला. रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथे सर्व संबंधित ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी यांची बैठक सोमवारी दुपारी झाली. त्यावेळी सर्व ग्रामपंचायतींनी अपुºया पाणीपुरवठ्याबाबत तक्रार केली. यामुळे ग्रामस्थांना तोंड कसे द्यावे, असा सवालही केला. 

नगर परिषदेला पाणी द्यावे लागत असल्याने ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आल्याचे एमआयडीसीकडून ग्रामपंचायतींना सांगण्यात आले. मात्र, नगर परिषदेच्या पाणीपुरवठ्यात कोणतीही वाढ झालेली नसताना ग्रामपंचायत पदाधिकाºयांना असे खोटे का सांगण्यात आले, असा प्रश्न करीत पुरेसा व दिलेल्या वेळेनुसार पाणी पुरवठा न झाल्यास शांत बसणार नाही, असेही सामंत यांनी यावेळी अधिकाºयांना सुनावले. 

एमआयडीसीच्या हरचेरी, निवसर, असोडे, अंजणारी, घाटिवळे,  या कोल्हापूर पध्दतीच्या धरण प्रकल्पांची एकूण पाणी साठवण क्षमता १६.५० दशलक्ष घनमीटर आहे. एमआयडीसीकडून कुवारबावला ६००, कर्ला-२००/३००, नाचणे ३५०/७००, शिरगाव-४५०, मिºया २००, मिरजोळे-६०/७०, रत्नागिरी नगर परिषदेला १५०० घनमीटर पाणी गेल्या काही वर्षांपासून पुरवले जात आहे. त्यामध्ये फारशी वाढ झालेली नाही. 

धरणसाठ्यात मोठी घसरण असताना, केलेली पाणीकपात समजण्याजोगी आहे. परंतु, उन्हाळ्यात २० टक्के कपात सांगितल्यानंतर प्रत्यक्षात ५० टक्केपर्यंत पाणीकपात केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये मार्च २०१८च्या पहिल्या पंधरवड्यात सुमारे ६५ टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा होता. त्यामुळे एमआयडीसीच्या हरचेरी, निवसर, असोडे, अंजणारी व घाटिवळे या धरणांमध्येही पाणीसाठा स्थिती नक्कीच चांगली आहे. मात्र, असे असतानाही एमआयडीसीने केलेल्या पाणीकपातीवरून वादळ निर्माण झाले आहे.

टॅग्स :WaterपाणीRatnagiriरत्नागिरी