शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

शिक्षक बदल्यांमध्ये ३० कोटींचा भ्रष्टाचार, आमदार भास्कर जाधव यांचा खळबळजनक आरोप

By मनोज मुळ्ये | Published: July 29, 2023 7:15 PM

शिक्षकांनी मंत्रालयातून अध्यादेश बदलून आणला

रत्नागिरी : शिक्षकांनी बदल्यांसाठी मंत्रालयातून शासकीय अध्यादेश काढून आणला. त्यातील एका वाक्याचा आधार घेत बदल्या थांबवण्यात आल्या होत्या. मात्र शिक्षकांनी मंत्रालयातून हा अध्यादेश बदलून आणला. या बदल्यांमध्ये ३० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे शिवसेनेचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. त्याचवेळी त्यांनी शिक्षक बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप केला. ज्यावेळी आपला मुलगा विक्रांत जाधव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, तेव्हा शिक्षकांनी मंत्रालयातून एक शासकीय अध्यादेश आणला. बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करावे, असा हा आदेश होता. मात्र त्यात शेवटी एक वाक्य होते की पर्यायी व्यवस्था झाल्याखेरीज या शिक्षकांना सोडू नये. त्यामुळे त्यावेळी बदली झालेल्या शिक्षकांना सोडण्यात आले नाही.त्यानंतर या शिक्षकांनी मंत्रालयात जाऊन शासकीय अध्यादेश बदलून आणला. त्यात हे वाक्य नव्हते. त्यामुळे या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले. त्यात ३० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे, अशी चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे, असे ते म्हणाले.

महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून आपल्याला काहीही निधी मिळालेला नाही. आता ती अपेक्षाही नाही. मात्र उद्धव ठाकरे सरकारने मंजूर केलेल्या कामांना या सरकारने स्थगिती दिली आहे. ज्या कामांना प्रशासकीय, वित्तीय मंजुरी आहे, अशी कामे थांबवता येत नाहीत. मात्र हे सरकार कायदा, नियम पायदळीच तुडवत आहे, असा आरोपही त्यांनी केला.सामंत यांचे नाव न घेता टीकाजिल्ह्यातील प्रशासनावर वचक राहिलेला नाही. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला काही महत्त्वाच्या खात्यांचे अधिकारी उपस्थित नव्हते. याआधी अधिकारी सभेला गैरहजर राहायला घाबरायचे. मात्र आता कोणाला फरक पडत नाही, अशी स्थिती असल्याची टीका आमदार जाधव यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे नाव न घेता केली.सामंत यांचे कौतुकही

महिला बचत गटांच्या बैठकीसाठी वर्षातून एकदा निधी देणे, त्यांना उत्पादनासाठी जागा देणे, त्यांच्या तयारी मालाच्या विक्रीसाठी जागा देणे, त्यांना मोबाईल देणे या आपण गतबैठकीत केलेल्या मागण्यांना पालकमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यानुसार तरतूदही झाली. त्यामुळे आपण सामंत यांचे कौतुक केले असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBhaskar Jadhavभास्कर जाधवTeacherशिक्षकTransferबदलीCorruptionभ्रष्टाचार