शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Ratnagiri: जयगडमध्ये वायू गळती, ६९ विद्यार्थिनींना बाधा

By मनोज मुळ्ये | Updated: December 12, 2024 18:00 IST

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथे अचानक एलपीजी वायूची गळती झाल्याने माध्यमिक विद्यामंदिरातील ६९ विद्यार्थिनींना बाधा झाल्याने परिसरात खळबळ उडाली ...

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथे अचानक एलपीजी वायूची गळती झाल्याने माध्यमिक विद्यामंदिरातील ६९ विद्यार्थिनींना बाधा झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत जयगड येथून सुमारे ६० विद्यार्थिनींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असून, शुक्रवारी त्यांना घरी पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे. या घटनेमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी जमली होती.गुरुवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास जयगड परिसरात अचानक वायू पसरला . येथील माध्यमिक विद्यामंदिरातील शिक्षक तसेच मुख्याध्यापक प्रदीप वाघोदे यांच्या हे लक्षात येताच त्यांनी तत्काळ जवळच्याच कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हात वर करून आमच्या कंपनीमध्ये अशी दुर्गंधी येत असलेला कोणताही गॅस अथवा वायू नसल्याचे सांगितले. त्यानंतर वाघोदे यांनी आपत्ती व्यवस्थापन तसेच माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

त्यावेळी काही विद्यार्थ्यांना त्रास जाणवत होता. आठ विद्यार्थ्यांना पाेटात मळमळ होऊन उलटीचा त्रास सुरू झाला. शिक्षणाधिकाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे मुख्याध्यापक वाघोदे यांनी त्या मुलांना काही वेळातच तेथील रुग्णालयात नेले. हळूहळू ही संख्या वाढत जाऊन ती ६० पर्यंत गेली. विद्यार्थ्यांवर उपचार करून काहींना घरी सोडण्यात आले. मात्र, दीड ते दोन तासांच्या अंतराने त्या विद्यार्थ्यांना पुन्हा अस्वस्थता वाटू लागली. त्यामुळे जयगड परिसरात खळबळ उडाली . रुग्णालयासमोर परिसरातील हजारो लोकांचा जमाव जमला . दरम्यान, विद्यार्थ्यांची तब्येत अधिकच बिघडू लागल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. त्यात विद्यार्थिनींची संख्या अधिक आहे.जयगड परिसर आणि रत्नागिरीतील सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. मिळेल त्या वाहनाने अत्यवस्थ विद्यार्थिनींना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते येत असलेल्या वाहनातून विद्यार्थिनींना उचलून नेत होते. काहींना स्ट्रेचरवर तर काहींना खुर्चीमध्ये बसवून हलवत होते. त्यामध्ये पोलिस तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. एका विद्यार्थिनीला मासळीच्या चारचाकी टेम्पोतून उपचारासाठी आणले गेले.या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर लगेचच उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईणकर आपल्या सहकारी अधिकाऱ्यांसह जिल्हा रुग्णालयात आले. विद्यार्थी रुग्णालयात येण्याआधीच मोठा फौजफाटा मदतीसाठी व बंदोबस्तासाठी तैनात होता. दोन विद्यार्थिनींना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रुग्णालयात मोठी गर्दीरुग्णांचे शेकडो नातेवाईक जिल्हा शासकीय रुग्णालयात जमा झाले होते. त्यांना पोलिस शांतता राखण्यास सहकार्य करण्याचे आवाहन करत होते. त्याला नातेवाइकांकडून प्रतिसादही देण्यात येत होता. मात्र, जिंदल कंपनी बंद करा, अशा घोषणाही रुग्णांचे नातेवाईक देत होते.

जिंदल कंपनीचा नकारजयगड परिसरातील वायू गळतीबाबत आपला काहीही संबंध नसल्याचे प्रसिद्धी पत्रक जिंदल कंपनीने प्रसिद्धीस दिले आहे. त्यामुळे जयगड परिसरात ही वायू गळती कुठून झाली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आज घरी पाठवणारमहसूल प्रशासनाने या प्रकाराची तातडीने दखल घेतली. उपविभागीय अधिकारी जीवन देसाई आणि तहसीलदार राजाराम म्हात्रे बराच काळ रुग्णालयातच होते. दरम्यान दाखल असलेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना शुक्रवारी घरी पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीStudentविद्यार्थीhospitalहॉस्पिटल