शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ३२.३७ टक्के मतदान

By मेहरून नाकाडे | Published: April 28, 2023 7:31 PM

११ जागांसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ११ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ११ हजार ११० मतदारांपैकी ३ हजार ४१५ मतदारांनी मतदान केले असून एकूण ३२.३७ टक्के मतदान झाले आहे. शनिवार दि.२९ एप्रिल रोजी निकाल असल्याने संचालकपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ११ जागांसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यासाठी शुक्रवारी मतदान झाले. जिल्ह्यातील नऊ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली, सकाळी दहा वाजेपर्यंत ४०५, दुपारी १२ वाजेपर्यंत ८२० तर दुपारी ३ वाजेपर्यंत २ हजार ४६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.सायंकाळी ५ वाजेपर्यंत ११ हजार ११० पैकी मतदारांपैकी ३ हजार ४१५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदानापैकी ३२.३७ टक्के मतदान झाल्याचे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामध्ये सहकारी संस्था मतदार संघातून एक हजार ६२१ तर ग्रामपंचायत मतदार संघातून एक हजार ७९४ मतदारांनी मतदान केले.बाजार समितीसाठी सहकार पॅनेलमधून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे शिवसेना, काँग्रेस, ठाकरे सेना असे सर्वच पक्ष एकत्र आले होते. मात्र तीन अपक्ष उमेदवारांमुळे निवडणूक घ्यावी लागली. सहकार पॅनेलचे हेमचंद्र माने, गजानन पाटील, सुरेश कांबळे हे तीन संचालक बिनविरोध निवडून आले आहेत.सहकार पॅनेलमधून ठाकरे सेना, शिंदे गट यांना प्रत्येकी ४, भाजपा, काँग्रेसला प्रत्येकी २, राष्ट्रवादीला ५ जागा देण्यात आल्या आहेत. मतदान अपेक्षेपेक्षा कमी झाले असून, ११ उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी सायंकाळी मतदान पेटीत बंद झाले. शनिवार दि.२९ एप्रिल रोजी ला मतमोजणी होणार असून, संचालक मंडळ निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूक