शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

रत्नागिरी स्मार्ट सिटी बनविण्यासाठी ४०० कोटी मंजूर, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 15:19 IST

महाविकास आघाडीच्या तिकीट वाटपाबाबत बाेलणे म्हणजे..

रत्नागिरी : जिल्ह्याचे ठिकाण असलेले रत्नागिरी शहर हे स्मार्ट सिटी बनावे, यासाठी महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळाने ४०० काेटी रुपये मंजूर केल्याची माहिती राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. त्याची निविदाही काढण्यात आली असून, त्याचे भूमिपूजन ५ किंवा ६ ऑक्टाेबर राेजी करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी जिल्ह्यातील विकासकामांबाबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळाने तळाेजा दत्तक घेऊन स्मार्ट सिटी म्हणून विकसित केले आहे. त्याच धर्तीवर रत्नागिरी स्मार्ट सिटी बनविण्यात येणार आहे.महामंडळाने वाटद एमआयडीसी, रिळ एमआयडी, स्टरलाइटची ५०० एकर जागा, मंडणगड, राजापूर येथे हाेणारी एमआयडीसी यांचा विचार करून रत्नागिरी जिल्ह्याचे ठिकाण असणारे रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी बनावं यासाठी ४०० काेटी रुपये मंजूर केले आहेत. रत्नागिरी शहरातील सगळ्या शाळा, शहरातील सगळे रस्ते, ‘आयआयटी’कडून अभ्यास केलेली ड्रेनेज सिस्टिम, ताेरण नाला या सर्व बाबी स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आल्या आहेत.

तसेच ग्रामीण भागात ज्या एमआयडीसी आहेत, त्याला लागून असलेल्या शाळा, पाखाड्या त्यामध्ये घेतलेल्या आहेत. रत्नागिरी स्मार्ट सिटी बनणे हे माझे स्वप्न नव्हते तर ते रत्नागिरीकरांचे स्वप्न आहे, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

‘ताे’ लाेकशाहीचा भागशरद पवार हे एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी कुठल्या मतदारसंघात जावे, कुठल्या मतदारसंघात जाऊ नये हा लाेकशाहीचा भाग आहे. त्यामुळे टिप्पणी करणे याेग्य नाही. अजित पवार यांच्याबाबतची बातमी धादांत खाेटी आहे.

‘त्यांचे उमेदवार लक्षलाभ’महाविकास आघाडीच्या तिकीट वाटपाबाबत बाेलणे म्हणजे महाविकास आघाडीला नाहक माेठे करण्यासारखे आहे. ज्या महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील २८८ जागांमध्ये आघाडी हाेऊनही उमेदवार मिळत नाही अशांनी अनेकवेळा आम्हाला सल्ला दिला आहे. त्यांचे उमेदवार त्यांना लक्षलाभ आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSmart Cityस्मार्ट सिटीUday Samantउदय सामंत