शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

रत्नागिरी जिल्ह्यात ४३ लाखाचा ध्वज दिन निधी संकलित

By शोभना कांबळे | Updated: December 10, 2024 18:27 IST

रत्नागिरी : आपले सैनिक सीमेवर रात्रंदिवस देशाचे रक्षण करीत आहेत. त्यामुळेच आपण शांततेची झोप घेत आहोत. त्यांच्या या कर्जातून ...

रत्नागिरी : आपले सैनिक सीमेवर रात्रंदिवस देशाचे रक्षण करीत आहेत. त्यामुळेच आपण शांततेची झोप घेत आहोत. त्यांच्या या कर्जातून आपण कधीही उतराई होऊ शकणार नाही, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलन शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावर्षी जिल्ह्यात ४३,१३,५३१ रुपयांचा ध्वज दिन निधी संकलित करण्यात आला.अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी व्यासपीठावर सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राजू सावंत, जिल्हा पुरवठा अधिकारी मारुती बोरकर, भूसंपादन विभाग (कोकण रेल्वे)च्या उपजिल्हाधिकारी रोहिणी रजपूत, जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद बिराजदार, नायब तहसीलदार माधवी कांबळे, अन्न प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त दीनानाथ शिंदे, माजी सैनिक आणि पत्रकार अरुण आठल्ये उपस्थित होते.प्रारंभी दीपप्रज्वलनानंतर अपर जिल्हाधिकारी बर्गे यांच्या हस्ते अमर जवान प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शौर्यपदकधारक नाईक बजरंग मोरे, शहीद कॅप्टन प्रेमकुमार पाटील यांचे वडील कृष्णा पाटील व आई राधा पाटील तसेच माजी सैनिक अरुण आठल्ये, शंकर मिल्के, बाळकृष्ण शिंदे व १९७१च्या युद्धामध्ये सहभागी झालेले एकनाथ सकपाळ, चंद्रकात पवार, कदम, मोहन सातव यांचा सन्मान करण्यात आला.ध्वज दिन निधीसाठी ६१ हजार रुपये देणाऱ्या शुभदा साठे, ११ हजार देणाऱ्या वैदेही रायकर, पाच हजारांचा निधी देणारे जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद बिराजदार यांनाही गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकारी लक्ष्मीकांत गवळी यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी