शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

२१०७ जागांसाठी ४३३२ उमेदवार निवडणूक रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 15:28 IST

evm ratnagiri-रत्नागिरी जिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींपैकी ११९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून आता ३६० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या ग्रामपंचायतींच्या २१०७ जागांसाठी ४३३२ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.

ठळक मुद्दे२१०७ जागांसाठी ४३३२ उमेदवार निवडणूक रिंगणात१५ जानेवारी रोजी मतदान, १८ जानेवारीला होणार उमेदवारांचा फैसला

रत्नागिरी : जिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींपैकी ११९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून आता ३६० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या ग्रामपंचायतींच्या २१०७ जागांसाठी ४३३२ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.कोरोनामुळे एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. जवळपास दोन महिन्यांपूर्वी या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. आता अनलॉक प्रक्रियेनंतर ४७९ ग्रामपंचायतींच्या १५०९ प्रभागांमधील ३९२१ सदस्यांसाठी या निवडणुका होणार आहेत.यासाठी ७२०३ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ८० अर्ज बाद झाले तर माघारीच्या दिवशी १०४८ उमेदवारांनी माघार घेतली. ११९ ग्रामपंचायतींतील १८१४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता ४७९ पैकी ३६० ग्रामपंचायतींच्या ४३३२ सदस्यांसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे. त्यात महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असून प्रवर्गाचा फायदाही महिलांना मिळणार आहे. मतदानासाठी १५९३ केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. १८ रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार उमेदवारांचा फैसला होणार आहे.संगमेश्वर तालुक्यात सर्वाधिक उमेदवार निवडणूक रिंगणातसंगमेश्वर तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यासाठी ११८८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. १६१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. १९ ग्रामपंचायतींच्या २९८ उमेदवारांची निवड बिनविरोध झाली आहे. त्यामुळे या तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींसाठी सर्वाधिक ७२९ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.सर्वाधिक बिनविरोध उमेदवार चिपळूण तालुक्यात जिल्ह्यातील एकूण ११९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत तसेच १८१४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींची सर्वाधिक संख्या खेड (२३) तर सर्वांत कमी मंडणगड तालुक्यात (२) आहे. मात्र, बिनविरोध उमेदवारांची सर्वाधिक संख्या चिपळूण (३४३) असून सर्वांत कमी मंडणगडात (४९) आहेत.महिला मतदारांची संख्या अधिकजिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आयोगाकडून घोषित करण्यात आल्या आहेत. या सर्व ग्रामपंचायतींचे एकूण मतदार ६ लाख ७५ हजार ५४१ आहेत. यापैकी पुरुष मतदारांची संख्या ३ लाख २७ हजार ३७४ तर स्त्री मतदार ३ लाख ४८ हजार १५५ आहे तसेच अन्य मतदारांची संख्या १२ आहे. जिल्ह्यात स्त्री मतदारांची संख्या २० हजारांनी अधिक असल्याने त्यांचे मत महत्त्वाचे ठरणार आहे. 

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनgram panchayatग्राम पंचायतRatnagiriरत्नागिरी