शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

तवसाळ किनारी आढळली कासवांची ८७२ अंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 19:25 IST

Wildlife Turtal Ratnagiri- गुहागर तालुक्यातील तवसाळ समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांची आठ घरटी सापडली असून, यामधील ८७२ अंड्यांचे जतन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी एकाच समुद्रकिनारी कासवांची एवढी घरटी व अंडी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे कासवप्रेमींसाठी व अभ्यासकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.

ठळक मुद्देतवसाळ किनारी आढळली कासवांची ८७२ अंडीजिल्ह्यात घरटी, अंडी मिळण्याची पहिलीच वेळ

असगोली : गुहागर तालुक्यातील तवसाळ समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांची आठ घरटी सापडली असून, यामधील ८७२ अंड्यांचे जतन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी एकाच समुद्रकिनारी कासवांची एवढी घरटी व अंडी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे कासवप्रेमींसाठी व अभ्यासकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.तवसाळ समुद्रकिनारी पूर्वी मोठ्या प्रमाणात या जातीच्या कासवांची अंडी सापडतात. कालांतरानंतर जेएसडब्ल्यू बंदर व चौगुले उद्योग समुहाचे बंदर विकसित झाल्यानंतर या ठिकाणी समुद्रातील वाहतुकीची रेलचेल मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे मध्यंतरीच्या कालखंडात या समुद्रकिनारी मादी कासवांचे अंडी घालण्याचे प्रमाण फारच कमी झाले होते. मात्र, यावर्षी कासवप्रेमींना ही आगळीवेगळी पर्वणी निर्माण झाली आहे.गावातील कासवप्रेमी युवक महेश सुर्वे हा गेली दोन वर्षे वनविभागाशी संबंधित आहे. या युवकाच्या लक्षात आल्यानंतर कासवांच्या अंड्यांबाबतची माहिती त्याने तातडीने गुहागर तालुक्याचे वनपाल यांना दिली. त्यानंतर वन विभागाने तातडीने सर्व अंड्यांचे जतन व संरक्षण केले आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे यावर्षी कासवांच्या प्रजननावरही परिणाम झाला आहे. किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येणाऱ्या कासवांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात कासव महोत्सवही होऊ शकलेला नाही. आता अंडी सापडू लागल्याने आनंद व्यक्त होत आहे.

वन विभागाच्या समन्वयातून व सहकार्यातून दापोली तालुक्यातील केळशीच्या धर्तीवर तवसाळमध्येसुद्धा कासव महोत्सव आयोजित करण्याचा मानस आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कासव महोत्सवामुळे तवसाळमधील पर्यटनात वाढ होऊन ग्रामस्थांना चांगल्या प्रकारचा रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. महोत्सवानिमित्ताने पर्यटकही याठिकाणी दाखल होतील.- नीलेश सुर्वे,अध्यक्ष, कांदळवन समिती, तवसाळ 

टॅग्स :wildlifeवन्यजीवRatnagiriरत्नागिरी