शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

बारावीचा कोकण मंडळाचा ९६.०१ टक्के निकाल; सिंधुदूर्ग जिल्हा प्रथम

By मेहरून नाकाडे | Published: May 25, 2023 2:26 PM

रत्नागिरी-सिंधुदूर्ग दोन्ही जिल्ह्यातून २६ हजार २८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. २४ हजार ९९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

रत्नागिरी :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागिय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून एकूण निकाल ९६.०१ टक्के इतका लागला आहे. बारावीच्या निकालामध्ये कोकण मंडळाने  राज्यात पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळविले  असले तरी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १.२० टक्केने निकाल घसरला आहे.  राज्यातील एकूण ९ मंडळामध्ये कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ पुणे मंडळाचा ९३.३४ टक्के तर कोल्हापूर मंडळाचा ९३.२८ टक्के इतका निकाल लागला आहे. पुणे व कोल्हापूर मंडळांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा क्रमांक मिळविला आहे. सर्वाधिक कमी निकाल मुंबई मंडळाचा असून ८८.१३ टक्के इतका लागला आहे.

रत्नागिरी-सिंधुदूर्ग दोन्ही जिल्ह्यातून २६ हजार २८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. २४ हजार ९९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण मंडळातून १३ हजार २२ मुलगे परीक्षेस बसले होते पैकी १२ हजार ३२० मुलगे उत्तीर्ण झाले आहेत.   मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.६० टक्के इतके आहे.  मंडळातून १३ हजार ६ मुली परीक्षेस बसल्या होत्या. पैकी १२ हजार ६७० विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.४१ टक्के आहे.  मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण २.८१ टक्केने अधिक आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातून १७ हजार १३४ विद्यार्थ्यानी नोंदणी केली होती पैकी १७ हजार ६९ परीक्षेस बसले होते. त्यातील १६ हजार २५४ विद्यार्थी पास झाले असून एकूण निकाल ९५.२२ टक्के इतका लागला आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातून ८ हजार ९८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती पैकी ८ हजार ९५९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. आठ  हजार ७३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ९७.५१ टक्के इतका लागला आहे. सालाबादप्रमाणे यावर्षीही सिंधुदूर्ग जिल्ह्याने निकालामध्ये सर्वोच्च स्थान राखले आहे. रत्नागिरीपेक्षा सिंधुदूर्ग जिल्ह्याचा २.२९  टक्के इतका अधिक आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालRatnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्ग