शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

Ratnagiri Crime: मूल होत नाही म्हणून हिणवलं; रागातून केला चिमुकलीचा खून, घरातच पुरला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 17:09 IST

रत्नागिरी : मूल होत नाही म्हणून हिणवल्याच्या रागातून रत्नागिरीतील चार वर्षांच्या अमैरा ज्युडान अन्वारी या चिमुकलीचा पाण्यात बुडवून खून ...

रत्नागिरी : मूल होत नाही म्हणून हिणवल्याच्या रागातून रत्नागिरीतील चार वर्षांच्या अमैरा ज्युडान अन्वारी या चिमुकलीचा पाण्यात बुडवून खून करून मृतदेह घरातच पुरल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (६ मार्च) उघड झाला आहे. कसलये-तिस्क फोंडा (गोवा) येथे हा प्रकार घडला. ही चिमुकली रत्नागिरी शहरातील राजीवडा येथील राहणारी आहे. या प्रकरणी गोवापोलिसांनी पती-पत्नीला अटक केली आहे.बाबासाहेब ऊर्फ पप्पू अल्लाट (५३) आणि पत्नी पूजा अल्लाट (३९, रा. फोंडा) अशी अटक केलेल्या दाेघांची नावे आहे. कसलये-तिस्क येथील अमैरा अन्वारी ही चिमुकली सकाळपासून बेपत्ता होती. या संबंधी फोंडा पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली हाेती. तिच्या घरासमोरील सुमारे ५० मीटर अंतरावरील अल्लाट कुटुंबीयाच्या घरी ये-जा करत होती. त्यामुळे पोलिसांनी दाेघांकडे चौकशी केली असता हा प्रकार उघडकीला आला.

अमैराची आई पूजाला मूल नसल्याने वांझ म्हणून हिणवत होती. त्यावरून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले हाेते. पूजाच्या डोक्यात हा राग खदखदत होता. तिने पती बाबासाहेब याच्या मदतीने त्या चिमुकलीला पळवून नेऊन तिचा कायमचा काटा काढल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.चाॅकलेटच्या बहाण्याने पळविलेअमैरा बाहेर बागडत असताना तिला या दोघांनी चाॅकलेटचे आमिष दाखवून पळवून टबमध्ये बुडवून ठार मारले. तिला बाहेर कुठेतरी पुरून टाकण्याच्या त्यांचा प्रयत्न होता. मात्र, तोपर्यंत ती बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल झाली हाेती. पोलिस तपासकामासाठी त्या मुलीच्या घराजवळ आले होते. आपले बिंग फुटेल म्हणून संशयितांनी त्या चिमुकलीला घरातच खड्डा खोदून पुरले होते.

कौटुंबिक वादामुळे गोव्यातअमैरा ही रत्नागिरी शहरातील राजीवडा येथील राहणारी आहे. मात्र, कौटुंबिक कारणावरून अमैरा ही तिची आई आणि बहिणीसह आजीकडे गोव्याला राहात होत्या.

नरबळी दिल्याचा आईचा आराेपअल्लाट दाम्पत्याने मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आपल्या मुलीचा नरबळी दिल्याचा आराेप अमैराची आई बाबीजान यांनी केला आहे. या प्रकरणाचा याेग्य तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :goaगोवाRatnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस