शहरं
Join us  
Trending Stories
1
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
2
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
3
भुजबळ-जरांगे समर्थक आमने-सामने; महामार्गावरील वाहतूक रोखली, येवल्यात तणाव!
4
Ind vs Aus Women: भारताच्या आशा मावळल्या! ऑस्ट्रेलियाने 9 धावांनी केला पराभव
5
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
6
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
7
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
8
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
9
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
10
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
11
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
12
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
13
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
15
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
16
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
17
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
18
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
19
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
20
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी

रत्नागिरी जिल्ह्यात अपघातांची मालिका, २३ दिवसात तब्बल ३६ अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 5:22 PM

रत्नागिरी : कोरोनाचे निर्बंध हटल्यानंतर प्रथमच यंदा जिल्ह्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली खरी, मात्र त्याचबरोबर अपघातांचे प्रमाणही वाढले ...

रत्नागिरी : कोरोनाचे निर्बंध हटल्यानंतर प्रथमच यंदा जिल्ह्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली खरी, मात्र त्याचबरोबर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. केवळ मे महिन्याच्या २३ दिवसात जिल्ह्यात ३६ अपघात झाले असून, त्यात १८ जण ठार, तर ५५ जण जखमी झाले आहेत. यातील बहुतांश अपघात मुंबई - गोवा महामार्गावर झाले आहेत.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे लोक घराबाहेर पडणे टाळत होते. सरकारी निर्बंधांपेक्षा कोरोनाच्या भीतीने लोक आपले घर, गाव सोडून बाहेर जात नव्हते. मात्र, यंदा वातावरण निवळले आहे. कोरोना जवळजवळ हद्दपार झाल्यात जमा आहे. त्यामुळे यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यात बहुसंख्य पर्यटक आले आहेत. रत्नागिरी, गुहागर, दापोली यांसारख्या किनारपट्टीच्या भागात तर पर्यटकांची खूप वर्दळ आहे.

वाहनांची वाढलेली वर्दळ लक्षात घेता बहुतांश पर्यटक हे खासगी वाहनानेच आले असल्याचे दिसत आहे. सद्यस्थितीत मुंबई - गोवा महामार्गावर आणि शहरांतर्गतही वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळेच जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

रुंदीकरण झाले, पण...

मुंबई - गोवा महामार्ग अरुंद आणि वळणावळणांचा असल्याने अपघातांची संख्या अधिक आहे, असा आक्षेप घेतला जात होता. महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर अपघातांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा होती. सद्यस्थितीत खेड तसेच चिपळूण तालुक्यातील बऱ्याचशा महामार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाले आहे. तेथील वळणे कमी झाली आहेत. पण तेथील अपघात अजूनही कमी झालेले नाहीत.

चांगला रस्ता, वेग वाढला

चांगल्या रस्त्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. वळणे कमी झाली असली तरी आहेत त्या वळणात गाड्यांचा वेग कमी होत नाही. कोकणाबाहेरील वाहनचालकांना या वळणांचा अंदाज येत नाही. त्यामुळे गाड्या रस्त्याशेजारी कलंडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यात बेपर्वाई हेच प्रमुख कारण आहे.

मदतीमुळे मृत्यू कमी

महामार्गावर शासकीय तसेच खासगी रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध होतात. नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिका थोड्याच वेळात अपघातस्थळी पोहोचतात. त्यामुळे अपघातांची संख्या अधिक असली तरी वेळेत उपचार मिळत असल्याने मृत्यूचे प्रमाण मात्र सुदैवाने आटोक्यात राहिले आहे.

तालुकानिहाय अपघात

१ मेपासून खेड आणि चिपळूण तालुक्यात प्रत्येकी ९, रत्नागिरीत ८, संगमेश्वरमध्ये ४, लांजात ३, राजापुरात २, तर दापोलीत एक अपघात झाला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातtourismपर्यटन