शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
3
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
4
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
5
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
6
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
7
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
8
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
9
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
10
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
11
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
12
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
13
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
14
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
15
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
16
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
17
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
18
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
19
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
20
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा

जिल्ह्यातील २०३ क्षय रुग्णांना घेतले दत्तक; पोषण आहाराची जबाबदारी स्वीकारली

By शोभना कांबळे | Published: April 04, 2023 8:08 PM

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय क्षयरोग विभागामार्फत प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत क्षयरुग्णांना दरमहा ५०० रुपये रुग्णाच्या खात्यावर जमा केले जातात.

रत्नागिरी : रत्नागिरीतील फिनोलेक्स कंपनी आणि मुकुल माधव फाऊंडेशन यांनी जिल्ह्यातील २०३ क्षय रूग्णांच्या पोषण आहाराची जबाबदारी स्वीकारली असून या रुग्णांना ६ महिन्याकरिता पोषण आहार पुरविला जाणार आहे. मंगळवार, दि. ४ एप्रिल रोजी रत्नागिरी तालुक्यातील ४० क्षय रुग्णांना पोषण आहार देऊन प्रारंभ करण्यात आला.

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय क्षयरोग विभागामार्फत प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत क्षयरुग्णांना दरमहा ५०० रुपये रुग्णाच्या खात्यावर जमा केले जातात. परंतु ही मदत अत्यंत अल्प असून याखेरीज अन्नपुरवठा व इतर सुविधा व सहकार्य मिळणे आवश्यक आहे, जेणेकरून रुग्णाची प्रकृती तत्परतेने पूर्ववत होण्यास मदत होईल. या अनुषंगाने केंद्रींय स्तरावरून निक्षय मित्र होऊन रुग्णांना सहकार्य करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे दानशूर व्यक्ती, औद्योगिक संस्था, सामाजिक संस्था यांना आवाहन करण्यात आले आहे. त्या आवाहनानुसार रत्नागिरी तालुक्यातील फिनोलेक्स कंपनी-मुकुल माधव फाऊंडेशनने जिल्ह्यातील २०३ क्षय रुग्णांना दत्तक घेतले आहे. या रूग्णांना ६ महिन्याकरिता पोषण आहार पुरविला जाणार आहे. या पोषण आहाराचा प्रारंभ मंगळवार, ४ एप्रिल रोजी रत्नागिरी तालुक्यातील ४० क्षय रुग्णांना देऊन करण्यात आला.

फिनोलेक्स कंपनी - मुकुल माधव फाऊंडेशनचे डायरेक्टर चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठले, जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. महेंद्र गावडे, वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण केंद्र डॉ.सूर्यवंशी, फिनोलेक्स कंपनीचे व्यवस्थापक सागर चिवटे, एच आर व्यवस्थापक संदीप गोगले, डॉ. अनुप करमरकर, अभिषेक साळवी तसेच क्षयरोग विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन फिनोलेक्स कंपनी-मुकुल माधव फाऊंडेशन व जिल्हा क्षयरोग केंद्र, रत्नागिरी यांच्या मार्फत करण्यात आले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी