शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
4
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
5
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
6
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
7
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
8
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
9
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
10
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
11
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
13
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
14
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
15
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
16
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
17
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
18
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
19
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
20
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...

सल्ला देणाऱ्यांनी आपल्या पक्षाचे आमदार, खासदार किती याचा विचार करावा; उदय सामंतांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

By मनोज मुळ्ये | Published: May 10, 2023 1:02 PM

सकाळी साडेनऊच्या बातमीपत्राबाबत पवार यांनी बरेच काही सांगितले

रत्नागिरी : आपणच जगातील एकमेव प्रवक्ते आहोत, अशा थाटात कुणालाही सल्ला देणार्यांनी आपल्या पक्षाचे आमदार, खासदार किती आहेत, याचा विचार करावा. राजकारणात भान असणे आवश्यक आहे, अशा शब्दात राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.रत्नागिरी दौऱ्याप्रसंगी आज, बुधवारी मंत्री सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना खासदार राऊत यांचा समाचार घेतला. खासदार राऊत यांच्या पक्षाच्या मुखपत्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. त्यावर मंत्री सामंत यांनी जोरदार हल्ला केला.महाविकास आघाडीची मोट ज्या शरद पवार यांनी बांधली, त्यांच्यावरच आता टीका केली जात आहे. सकाळी साडेनऊच्या बातमीपत्राबाबत पवार यांनी बरेच काही सांगितले आहे. त्यामुळे त्याचे राऊत यांनी आत्मचिंतन करावे, असे सामंत यांनी सांगितले.आतापर्यंत जे आम्हाला सल्ले देत होते, तेच आता शरद पवार यांनाही सल्ले देत आहेत. त्यांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राने पाहिला आहे. प्रत्येकाच्या पक्षात वाकून बघायचे, हा काय प्रकार आहे, अशा शब्दात पवार यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे. हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण आम्ही जे पूर्वीपासून सांगत होतो, तेच आता शरद पवारही सांगत आहेत. यांची दखल घेत नाही, असे पवार यांनी सांगितले आहे आणि तेच महत्त्वाचे आहे, असे सामंत यांनी सांगितले.

पवारांनी सर्वच पक्षांना रामबाण सल्ला दिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रसिद्ध होत असल्याने अनेकांना दु:ख होते. सकाळी साडेनऊ वाजताही तेच होते. यावर शरद पवार यांनी सर्वच पक्षांना रामबाण सल्ला दिला आहे. तो म्हणजे हे जे काही बोलतात, त्याकडे दुर्लक्ष करा, असे पवार यांनी म्हटले आहे. तेच बरोबर आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.

यांचे सर्व खोके एकनाथ शिंदेंनी बंद केलेएकनाथ शिंदे यांनी काही खोके कर्नाटकला दिल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्याचा समाचार घेताना मंत्री सामंत म्हणाले की, दहा महिन्यात यांना खोकल्याशिवाय काही दिसलेले नाही. यांचे सर्व खोके एकनाथ शिंदे यांनी बंद केले आहेत. त्यामुळे यांना स्वप्नातही खोकेच दिसत आहेत. जे खोके घेत होते, जे महानगरपालिकेमध्ये बोके होते, त्यांचा सर्व चरितार्थ थांबल्यामुळे आता त्यांची चिडचिड होत आहे. त्यामुळे या नैराश्येतूनच सकाळी साडेनऊ वाजता पत्रकार परिषद होत आहे, अशी टीका सामंत यांनी केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतSanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवार