शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

शिक्षणात पहिलीपासून कृषी विषयाचा समावेश करणार, शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 12:01 IST

संपूर्ण भारतातील पहिला प्रयाेग

दापोली (रत्नागिरी) : कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतीचे शास्त्रशुद्ध ज्ञान घेऊन व्यवहारिक शेती केली तर शेतीमधून चांगल्या प्रकारचे अर्थार्जन होऊ शकते. खरंतर विद्यार्थी जसे घडवू तसे घडतात. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून शेतीविषयक माहिती मिळण्यासाठी पहिलीपासून कृषीचा शालेय शिक्षणात समावेश करण्यात येणार असल्याची घाेषणा राज्याची शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दापोलीत केली.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे जागतिक बँक पुरस्कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प-संस्थात्मक विकास योजना आयोजित ‘आधुनिक कृषी शिक्षणाची संधी : भविष्याची उज्ज्वल नांदी’ या विषयावरील कार्यशाळेचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमावेळी मंत्री केसरकर बाेलत हाेते.यावेळी व्यासपीठावर कुलगुरू डाॅ. संजय भावे, कार्यकारी परिषद सदस्य संदीप राजपुरे, सुनील दळवी, शिक्षण संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत, संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे, कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर, विद्यापीठ अभियंता निनाद कुळकर्णी, स्वीय सहायक जितेंद्र काळेपाटील, डॉ. अतुल मोहोड, डॉ. संतोष सावर्डेकर, डॉ. विनायक पाटील, दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे, उपविभागीय कृषी अधिकारी दिशांत कोळप उपस्थित होते.मंत्री केसरकर म्हणाले, कोकण कृषी विद्यापीठाने विविध प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. कोकणातील पाणीटंचाईवर विद्यापीठाने कोकण विजय बंधारा विकसित केला आहे. त्याबरोबरच टायर बंधारे प्रात्यक्षिके आयोजित करावीत. भविष्यातील कृषी शिक्षणाची गरज ओळखून पहिलीपासूनच आता विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचे धडे मिळणार आहेत. कृषी शिक्षणासाठी नवा मसुदा तयार झाला असून, चालू वर्षापासून पहिलीपासून कृषी शिक्षण सुरू करण्याचा मानस असल्याचे मंत्री केसरकर म्हणाले.

संपूर्ण भारतातील पहिला प्रयाेगहा कृषी शिक्षण महोत्सव संपूर्ण भारतातील २२ कृषी विद्यापीठांच्या योजनेंतर्गत प्रथमच दापोली येथे आयोजित करण्यात आला आहे, असे काेकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. संजय भावे यांनी सांगितले.

शिक्षकांना कृषी प्रशिक्षण देणारराज्यातील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणासाठी धडे देताना जिल्हा परिषद शिक्षकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कृषी विद्यापीठाशी सामंजस्य करार केला जाणार आहे. त्या-त्या कृषी विद्यापीठांकडून शिक्षकांना कृषी शिक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर कृषीचे प्रशिक्षण घेणारे शिक्षक विद्यार्थ्यांना कृषीचे शिक्षण देणार आहेत. पहिलीपासून कृषी शिक्षण देण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी कृषी विभागाची भूमिका महत्त्वाची असणार आहे, असे मंत्री केसरकर म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDipak Kesarkarदीपक केसरकरAgriculture Sectorशेती क्षेत्रEducationशिक्षण