शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

‘पीएम किसान’ची सगळी मदार कृषी सेवकांवरच; रत्नागिरीच्या कृषी विभागात स्वतंत्र मनुष्यबळ, ना तांत्रिक प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 7:01 PM

कृषी विभागाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे

रत्नागिरी : केंद्र शासनातर्फे राबविण्यात येणारी ‘पंतप्रधान किसान सन्मान योजना’ असो किंवा राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेली ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभाग धडपडत आहे. स्वतंत्र मनुष्यबळ, तांत्रिक प्रशिक्षण व कार्यालयीन सुविधा उपलब्ध नसल्याने कृषी विभागाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.राज्यात पीएम किसान योजना सन २०१९ पासून राबविण्यात येत आहे. सुरुवातीला या योजनेची अंमलबजावणी महसूल, कृषी व ग्रामविकास विभागातर्फे करण्यात आली. या योजनेचे सनियंत्रण महसूल विभागाकडे होते. मात्र, महसूल विभागाने ही योजना राबविण्यास स्पष्ट नकार दिल्याने ही योजना कोणतेही मनुष्यबळ व सुविधा निर्माण न करता कृषी विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली.नुकतेच पीएम किसान योजनेचा १७वा हप्ता वितरित करण्यात आला. या हप्त्यापासून वंचित राहिलेले शेतकरी हे तालुका कृषी कार्यालयातून गर्दी करू लागले आहेत. मात्र, या योजनेसाठी स्वतंत्र मनुष्यबळ व तांत्रिक प्रशिक्षण नसल्यामुळे कृषी विभागासमोर पेच निर्माण होत आहे.पीएम किसान पोर्टलवर वंचित शेतकऱ्यांच्या नोंदणी स्टेटसनुसार येणाऱ्या चुकांविषयी (एरर) कोणतीही तांत्रिक माहिती नसल्यामुळे व स्वतंत्र मनुष्यबळ नसल्याने शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसन करता येत नाही.त्यामुळे पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेसाठी स्वतंत्र मनुष्यबळ, कार्यालयीन सुविधा व जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात येत आहे. कृषी विभागाकडे योजना हस्तांतर करण्यापूर्वी पुरेसे मनुष्यबळ, सुविधा पुरविण्याबाबत आश्वासन दिले होते. परंतु, आश्वासनाची पूर्तता न करताच ही योजना कृषी विभागाकडे हस्तांतरित केली. त्यानंतर कृषी आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत अडचणींचे निराकरण करण्याबाबत आश्वासित करण्यात आले होते. मात्र, याबाबत अद्याप कोणताच ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.गावपातळीवर कृषी सहायकांना प्रशिक्षण, जबाबदारीचे वाटप (लँड सिडिंग, मृत लाभार्थी यादी), मदतनीस, लॅपटाॅपसारख्या सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. जिल्ह्यात ३६३ कृषी सहायकांची पदे मंजूर असताना अवघे १५० कृषी सहायक कार्यरत आहेत. उर्वरित पदे रिक्त आहे. त्यामुळे आधीच विविध जबाबदारी असताना ‘पीएम किसान’चा भार सोसावा लागत आहे. त्यात लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची नाराजी कृषी सहायकांना सोसावी लागत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAgriculture Sectorशेती क्षेत्रPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना