शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा पुन्हा महिलेच्या हाती; AAP च्या बैठकीत नाव ठरलं
2
अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? महाराष्ट्राचे 3 शत्रू सांगत संजय राऊत राज ठाकरेंबद्दल हे काय बोलले?
3
Atishi : याला म्हणतात नशीब! 4 वर्षांपूर्वी आमदार अन् आता थेट मुख्यमंत्री
4
कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्याचा वाढदिवशीच मृत्यू, तलावाकाठी पार्टी साजरी करायला गेला अन्...
5
PN Gadgil Jewellersच्या आयपीओची धमाकेदार एन्ट्री, ७४% प्रीमिअमवर लिस्टिंग; पहिल्या दिवशी मोठा फायदा
6
जिओच्या नेटवर्कने मुंबई, पुण्यात मान टाकली; करोडो युजर्स त्रस्त, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
7
Mamata Banerjee : कोलकाता प्रकरण : डॉक्टरांपुढे ममता बॅनर्जी झुकल्या; कोणत्या मागण्या केल्या मान्य, नेमकं काय घडलं?
8
पुणे, नागपूर आता पुन्हा पुणे... दारुडा कार घेऊन आता मंत्र्यांच्या ताफ्यालाच धडकला; पाटलांची पहिली प्रतिक्रिया
9
Afcons Infra IPO: ज्या कंपनीनं अबुधाबीत मंदिर उभारलं, अंटरवॉटर मेट्रो तयार केली, त्यांचा येणार IPO; पाहा डिटेल्स
10
अतिशी दिल्लीच्या तिसऱ्या महिला CM; मुख्यमंत्री बनताच दरमहिना किती सॅलरी मिळणार?
11
"सर्वांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही", अजित पवारांचे मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलले?
12
रामजी की निकली सवारी, ठेका धरत मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरीची जल्लोषात मिरवणूक सुरू 
13
Ganesh Visarjan 2024 Live : गणपती चालले गावाला... मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू
14
माझ्या कार्यक्रमात काँग्रेसने घुसण्याचा प्रयत्न केला तर तिथेच गाडणार; संजय गायकवाडांची धमकी
15
मी पुन्हा येईन! 'घायाळ' अजिंक्य रहाणेची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत
16
साडेतीन तास झोप, सायंकाळी 6 नंतर काहीही खात नाहीत अन्...; असं आहे 74 वर्षांच्या मोदींचं डेली रुटीन
17
तिप्पट होऊ शकतो पैसा, Bajaj Housing Finance च्या शेअरला पहिलं 'बाय' रेटिंग; किती आहे टार्गेट प्राईज?
18
पुण्यात वैभवशाली मिरवणुकीला ढोल ताशांच्या गजरात सुरुवात; मानाचा पहिला कसबा गणपती समाधान चौकातून मार्गस्थ 
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी १२ तास तळ ठोकून होता; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
बॉलिवूड अभिनेत्यांवर कंगना राणौतने केले धक्कादायक आरोप, म्हणाली- "मेसेज करून घरी बोलवतात..."

Amba Ghat: आंबा घाट वाहतुकीसाठी बनतोय जीवघेणा, दुरुस्ती तकलादू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 12:06 PM

घाटातील वाहतूक धोकादायक ठरत असताना घाटामधून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक अद्यापही सुरूच

सागर पाटीलटेंभ्ये: पश्चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणारा आंबा घाट सध्या वाहतुकीसाठी जीवघेणा बनत आहे. अतिवृष्टीनंतर आंबा घाटात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. दुरुस्तीच्या कामानंतर त्याठिकाणी लोखंडी सळ्या उघड्या झाल्या आहेत. वाहनचालकांसाठी या सळ्या धोकादायक ठरत आहे.रत्नागिरी व कोल्हापूर या दोन महत्त्वपूर्ण जिल्ह्यांना जोडणारा सर्वात सुरक्षित घाट म्हणून आंबा घाटाची ओळख आहे. घाटातून जाणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या हा घाट जीवघेणा ठरत आहे. रत्नागिरीच्या हद्दीतील पाच ते सात किलोमीटरचा रस्ता सोडता घाटातील सर्व रस्ता पूर्णतः उखडला आहे.अनेक ठिकाणी एक ते दीड फूट खोलीचे खड्डे पडले आहेत. दोन वर्षांपूर्वी दरड कोसळलेल्या ठिकाणी अद्यापही दुरुस्ती सुरू आहे. या ठिकाणी बांधकाम खात्याकडून काँक्रीट करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे केवळ एक ते दोन महिन्यांमध्येच या काँक्रीटमधील लोखंडी सळ्या उघड्या झाल्या आहेत.घाटातील वाहतूक धोकादायक ठरत असताना घाटामधून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक अद्यापही सुरूच आहे. घाटाची पूर्ण दुरुस्ती होईपर्यंत अवजड वाहतुकीवर निर्बंध घालणे आवश्यक असल्याचे मत प्रवाशांमधून व्यक्त केले जात आहे. बांधकाम खात्याने किमान तात्कळ कार्यवाही करत घाट रस्त्यावरी जीवघेणे खड्डे बुजवणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीroad transportरस्ते वाहतूक