शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लागू यांची सामाजिक बांधिलकी कायम राहिली, हेगशेट्ये यांनी सांगितल्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 11:27 IST

अभिनय क्षेत्रात काम करतानाच डॉ. लागू यांची सामाजिक बांधिलकी कायम राहिली, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार आणि नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये यांनी लोकमतला दिली.

ठळक मुद्देलागू यांची सामाजिक बांधिलकी कायम राहिली, हेगशेट्ये यांनी सांगितल्या आठवणीलग्नाची बेडी नाटकाच्या प्रयोगासाठी एकही रूपया घेतला नाही

शोभना कांबळेरत्नागिरी : सामाजिक कृतज्ञता निधी संकलनाचे काम महाराष्टभर सुरू होते. या निधीला हातभार लावण्यासाठी डॉ. श्रीराम लागू यांनी पुढाकार घेऊन लग्नाची बेडी या नाटकाचे प्रयोग मानधनाचा एकही पैसा न घेता महाराष्ट्रात केले आणि त्यातून निधी गोळा केला. या नाटकाच्या निमित्ताने डॉ. लागू रत्नागिरीत आणि चिपळुणात आले होते.

अभिनय क्षेत्रात काम करतानाच डॉ. लागू यांची सामाजिक बांधिलकी कायम राहिली, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार आणि नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये यांनी लोकमतला दिली.डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या रत्नागिरीतील वास्तव्याच्या आठवणी हेगशेट्ये यांनी जाग्या केल्या. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अभिजीत हेगशेट्ये यांच्याकडे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची जबाबदारी दिली होती.

सामाजिक संस्थेत काम करताना पैशांची अपेक्षा कधीच केली नाही. त्यामुळे या कार्यकर्त्यांसाठी निधी उभारण्यासाठी डॉ. दाभोलकर आणि डॉ. लागू यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम १९९६-९७च्या सुमारास सुरू झाला होता.

सिंधुदुर्गातील वेंगुर्ला, मालवण यानंतर रत्नागिरी, चिपळूण याठिकाणी लग्नाची बेडी हे नाटक झाले. त्यावेळी डॉ. लागू यांच्यासह निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, रोहिणी हट्टंगडी, रिमा लागू, भारती आचरेकर आदी मातब्बर कलाकार रत्नागिरीत आले होते.डॉ. लागू यांच्या गुणवैशिष्ट्यांबद्दल हेगशेट्ये म्हणाले की, डॉ. लागू हे मोठे व्यक्तिमत्व होते. मात्र, ते सामान्यांसारखेच राहिले. प्रत्यक्षात ते नटसम्राट होते. कित्येक दशके त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केले. रंगमंचावरील डॉ. लागू आणि प्रत्यक्षातील डॉ. लागू हे वेगळेच असायचे. ते पक्के तत्वनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ होते.

सामाजिक जाणीव असल्याने सामाजिक बांधिलकी मानणारे होते. म्हणूनच लग्नाची बेडी या नाटकाचे सलग प्रयोग करताना नाटकाच्या टीममधील एकाही अभिनेत्याने किंवा अभिनेत्रीने मानधनाचा एकही पैसा घेतला नाही. हे केवळ डॉ. लागूंमुळे झाले. कारण नाट्यक्षेत्रात त्यांचे दादा व्यक्तिमत्व होते.तिकीट विक्रीतून १ लाख ६० हजार जमारत्नागिरीतील निधी संकलनासाठी जे. के. फाईल्सचे तत्कालिन सरव्यवस्थापक सर्वोत्तम ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत आप्पा बेर्डे, भाई बेर्डे ही मंडळी होती. या सर्वांच्या सहकार्याने लग्नाची बेडी नाटकाच्या तिकीट विक्रीतून त्याकाळी तब्बल १ लाख ६० हजार रूपयांचा सामाजिक कृतज्ञता निधी रत्नागिरीतून गोळा करण्यात आला होता. डॉ. लागू यांनी कोणतेही मानधन न घेता या नाटकाचे प्रयोग केले होते. 

टॅग्स :Shriram Lagooश्रीराम लागूRatnagiriरत्नागिरी