शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

Ratnagiri: राजापुरात दुसऱ्या दिवशीही गाड्या तरंगत्याच, नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 11:45 IST

राजापूर : शहरातील जवाहर चौकालगत असणाऱ्या खर्ली नदीपात्रात गुरुवारी दुसऱ्या दिवशीही भरतीच्या पाण्यात अनेक वाहने अडकल्याची घटना घडली. बुधवारी ...

राजापूर : शहरातील जवाहर चौकालगत असणाऱ्या खर्ली नदीपात्रात गुरुवारी दुसऱ्या दिवशीही भरतीच्या पाण्यात अनेक वाहने अडकल्याची घटना घडली. बुधवारी भरतीच्या पाण्यात गाड्या अडकल्यानंतर राजापूर महसूल प्रशासन व नगर परिषद प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे या ठिकाणी काेणतीच उपाययाेजना न केल्याने गुरुवारी पुन्हा अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे.गतवर्षी राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना व कोदवली नद्यांच्या पात्रातील गाळउपशाचे काम लोकसहभागातून करण्यात आले. त्यानंतर खर्ली नदीपात्रात सातत्याने भरतीचे पाणी येत आहे. या वर्षी डिसेंबर महिन्यापासूनच खर्ली नदीपात्र पूर्णत: काेरडे झाले आहे. राजापूर शहरात कुठेही पार्किंगची व्यवस्था नसल्याने उन्हाळ्यात खर्ली नदीपात्राचा वापर पार्किंगसाठी करत आहेत. तसेच खरेदीसाठी ग्रामीण भागातून येणारे ग्रामस्थही नदीपात्रातच आपली वाहने उभी करतात. त्यामुळे या भागात सुरक्षेच्या दृष्टीने उपाययाेजना करणे गरजेचे हाेते.

गतवर्षी राजापूर नगर परिषदेने या ठिकाणी सूचनाफलक लावून नागरिकांना सावध केले हाेते. मात्र, या वर्षी तसा सूचनाफलक लावण्यात आलेला नाही. खर्ली नदीपात्रातील गाळामुळे भरतीचे पाणी या ठिकाणी येत नव्हते. मात्र, गतवर्षी गाळ उपसा केल्यानंतर हे पात्र रुंद झाल्याने अर्जुना व काेदवली नदीतील भरतीचे पाणी या ठिकाणी येत आहे. बुधवारी खर्ली नदीपात्रात भरतीच्या पाण्यात अनेक वाहने बुडून त्यांचे नुकसान झाले. गुरुवारीही पुन्हा भरतीचे पाणी या ठिकाणी आल्याने वाहने पाण्यात तरंगत हाेती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीriverनदीRajapurराजापुर