शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
2
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
3
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
4
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
5
IND vs NZ : कसोटी जिंकण्याची गॅरंटी किती? रेकॉर्ड बघून म्हणाला; "टीम इंडिया है तो मुमकिन है"
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!
7
महागड्या प्लॅनचे टेन्शन संपले, Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?
9
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली
10
IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान
11
महाविकास आघाडीला झटका! अखिलेश यादवांनी चार उमेदवार केले जाहीर
12
झारखंडमध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; पोलीस महासंचालकांना हटविले
13
माढ्यात तुतारीबाबतचा संभ्रम कायम; चार इच्छुक शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर काय घडलं? 
14
"प्रत्यार्पण करण्यास नकार दिला तर..."; शेख हसीना प्रकरणात बांगलादेशचा भारताला इशारा
15
Scorpio पेक्षा महागडी आहे 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत पाहून तुमचा विश्वास बसणार नाही
16
"राणा हे आमदार नव्हे, तर सावकार आहेत", रवी राणांवर भाजपच्या तुषार भारतीयांचा हल्लाबोल
17
२० हून अधिक विमानांना धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क; जयपूरमध्ये एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18
गौरवास्पद! विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
19
IND vs NZ : टीम इंडियानं ३५६ धावांची पिछाडी भरून काढत रचला खास रेकॉर्ड; आता...
20
आटपाडीच्या ओढ्याला ५०० च्या जुन्या-नव्या नोटांचा पूर आला; नागरिकांनी लुटल्या लाखोंच्या नोटा

हिंदूंमध्ये माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न - पालकमंत्री उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 1:32 PM

रत्नागिरी : गेल्या काही महिन्यांत चार घटना अशा घडल्या की, त्याचा आधार घेत काही ठराविक लोक हिंदू समाजात माझी ...

रत्नागिरी : गेल्या काही महिन्यांत चार घटना अशा घडल्या की, त्याचा आधार घेत काही ठराविक लोक हिंदू समाजात माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या घटना घडल्या त्यात मी कोणाला पाठीशी घातले आहे का, कोणावर कारवाई न करण्यासाठी पोलिसांना फोन केला आहे का, हे तपासा. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी असे काही पुरावे दिले, तर मी राजकारण सोडेन. अन्यथा अशा लोकांनी बिनबुडाचे आरोप करणे थांबवावे, असा सणसणीत इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला.रत्नागिरीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली. रत्नागिरी एमआयडीसी परिसरात गायीचा अवयव सापडला, आंदोलन झाली. एका मुलीबाबत काही गैरप्रकार घडला, वक्फ बोर्डाच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाप्रसंगी गोंधळ झाला. कोणत्याही वाईट किंचा चुकीच्या कृत्याचे समर्थन मी कधीही करणार नाही. या चार घटनांमध्ये काही ठराविक लाेक मलाच लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदू समाजामध्ये माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणाले.एमआयडीसीमध्ये जो काही प्रकार घडला त्याबाबत एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला. महिलेबाबतच्या प्रकरणात खरेतर पोलिसांचा अहवाल आतापर्यंत जाहीर होणे अपेक्षित होते. आठ -दहा दिवसांत तोही स्पष्ट होईल. वक्फ बोर्डाच्या कार्यालयाबाबतही मला लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला. मात्र हे कार्यालय २५ मे २०२३ रोजी मंत्रिमंडळाने मंजूर केले आहे. ते मी मंजूर केलेले नाही, असेही सामंत यांनी सांगितले.

..तर माझ्याच लाेकांवर गुन्हे दाखल झाले असते का?संघाच्या पथसंचलन प्रकरणात पोलिसांनी ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत, त्यात शुभम साळवी याच्यासह सात ते आठ माझेच सहकारी आहेत. माजी नगरसेवक मुसा काझी हेही माझ्या पक्षाचे आहेत. जर मी यात हस्तक्षेप केला असता, तर माझ्याच लाेकांवर गुन्हे दाखल झाले असते का, असा प्रश्न सामंत यांनी केला. लाठीहल्ल्याचा आदेश कोणाचा होता, याची चौकशी करण्याची मागणी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केली आहे. त्याला मी पूर्ण सहमत आहे. खरोखरच हे शोधून काढा, असे सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत