शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

हिंदूंमध्ये माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न - पालकमंत्री उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 13:32 IST

रत्नागिरी : गेल्या काही महिन्यांत चार घटना अशा घडल्या की, त्याचा आधार घेत काही ठराविक लोक हिंदू समाजात माझी ...

रत्नागिरी : गेल्या काही महिन्यांत चार घटना अशा घडल्या की, त्याचा आधार घेत काही ठराविक लोक हिंदू समाजात माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या घटना घडल्या त्यात मी कोणाला पाठीशी घातले आहे का, कोणावर कारवाई न करण्यासाठी पोलिसांना फोन केला आहे का, हे तपासा. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी असे काही पुरावे दिले, तर मी राजकारण सोडेन. अन्यथा अशा लोकांनी बिनबुडाचे आरोप करणे थांबवावे, असा सणसणीत इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला.रत्नागिरीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली. रत्नागिरी एमआयडीसी परिसरात गायीचा अवयव सापडला, आंदोलन झाली. एका मुलीबाबत काही गैरप्रकार घडला, वक्फ बोर्डाच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाप्रसंगी गोंधळ झाला. कोणत्याही वाईट किंचा चुकीच्या कृत्याचे समर्थन मी कधीही करणार नाही. या चार घटनांमध्ये काही ठराविक लाेक मलाच लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदू समाजामध्ये माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणाले.एमआयडीसीमध्ये जो काही प्रकार घडला त्याबाबत एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला. महिलेबाबतच्या प्रकरणात खरेतर पोलिसांचा अहवाल आतापर्यंत जाहीर होणे अपेक्षित होते. आठ -दहा दिवसांत तोही स्पष्ट होईल. वक्फ बोर्डाच्या कार्यालयाबाबतही मला लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला. मात्र हे कार्यालय २५ मे २०२३ रोजी मंत्रिमंडळाने मंजूर केले आहे. ते मी मंजूर केलेले नाही, असेही सामंत यांनी सांगितले.

..तर माझ्याच लाेकांवर गुन्हे दाखल झाले असते का?संघाच्या पथसंचलन प्रकरणात पोलिसांनी ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत, त्यात शुभम साळवी याच्यासह सात ते आठ माझेच सहकारी आहेत. माजी नगरसेवक मुसा काझी हेही माझ्या पक्षाचे आहेत. जर मी यात हस्तक्षेप केला असता, तर माझ्याच लाेकांवर गुन्हे दाखल झाले असते का, असा प्रश्न सामंत यांनी केला. लाठीहल्ल्याचा आदेश कोणाचा होता, याची चौकशी करण्याची मागणी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केली आहे. त्याला मी पूर्ण सहमत आहे. खरोखरच हे शोधून काढा, असे सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत