शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
5
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
6
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
7
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
8
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
9
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
10
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
11
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
12
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
13
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
14
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
15
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
16
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
17
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
18
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
19
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
20
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु

भातगाव ग्रामस्थांची तहसीलदार कार्यालयावर धडक

By admin | Published: March 16, 2015 11:16 PM

पाणी अडवल्याची तक्रार : सामोपचाराने तोडगा काढण्याचा ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय

गुहागर : भातगाव धक्का येथे पुरुषोत्तम गणेश करमरकर यांनी आपल्या मालकीच्या जागेतून जाणाऱ्या नैसर्गिक झऱ्याचे पाणी अडवल्याप्रकरणी येथील महिला व ग्रामस्थांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांकडे धाव घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. २० मार्चला याबाबत एकत्र चर्चा करुन सामोपचाराने तोडगा काढला जाणार आहे.भातगाव धक्का येथे ६५ घरांची वस्ती आहे. पिण्याचे पाण्याची टंचाई असल्याने वाडी बाहेरुन जंगलभागातून नैसर्गिक स्रोताचे पाण्यावर अवलंबून राहवे लागते. हे पाणी पुरुषोत्तम गणेश करमरकर नामक ग्रामस्थांच्या मालकीच्या जागेतून येत असल्याने करमरकर यांचेकडून या डोहामध्ये बांधकाम करुन पाणी अडवले होते. याबाबत प्रथम तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर हे बांधकाम तोडण्याचे आदेश दिले होते. यावेळी तलाठी व ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत डोहामध्ये पाईप टाकून जनावरांसाठी पिण्याचे पाण्याची सोय करण्यात आली होती, काही दिवसांनी हे पाईप उडवून टाकल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत असून, या प्रकारांविरूध्द आता ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. करमरकर व ग्रामस्थांमध्ये हा वाद वाढण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हटले आहे.याबाबत तहसीलदार वैशाली पाटभल, पोलीस निरीक्षक विनित चौघरी, सभापती राजेश बेंडल, पंचायत समिती कक्ष अधिकारी दत्ताराम आंबी, ग्रामीण पाणी पुरवठ्याचे जी. व्ही. गायकवाड आदींच्या उपस्थितीत चर्चा झाल्यानंतर २० मार्चला एकत्रित चर्चा करुन तोडगा काढण्याचे ठरले. दरम्यान हा विषय आता गावपातळीवर गाजण्याची शक्यता निर्माण झाले आहे.यावेळी महिला वंदना पाष्टे, इंदिरा मोरे, सुरेखा मोरे, वैशाली सोलकर, उज्वला डिंगणकर, रोहिणी गाडेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)