शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
2
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
3
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
4
परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, वाहनांची नासधूस, शहरात तणावपूर्ण शांतता
5
बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 
6
"आता सुरूवात झालीय, येत्या काळात..."; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा
7
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
8
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
9
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
10
"घटस्फोट झाला तर मी मरून जाईन", इमरान खानची Ex पत्नी डिव्होर्सवर पहिल्यांदाच बोलली
11
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
12
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
13
आफ्रिकेतील बोत्स्वानातून आणणार आणखी ८ चित्ते; पुढील महिन्यापर्यंत ४ चित्ते दाखल होण्याची शक्यता
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
15
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
16
चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
17
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
18
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
19
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
20
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा

रत्नागिरी जिल्ह्यातील तीन बंदरे अत्याधुनिक बनविणार : पालकमंत्री उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 12:10 IST

राजापुरातील साखरीनाटे बंदराचे भूमिपूजन

राजापूर : साखरीनाटे, मिरकरवाडा, हर्णे ही तीनही बंदरे जिल्ह्यातील मच्छीमारांना ताकद देणारी आहेत. या बंदरांचा विकास करून कर्नाटक राज्यामधील मल्पी बंदरापेक्षाही अत्याधुनिक बनविणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.राजापूर तालुक्यातील साखरीनाटे बंदराचे भूमिपूजन मंत्री सामंत यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला सिंधुरत्न योजनेचे निमंत्रित सदस्य किरण सामंत, सरपंच गुलजार ठाकूर, सरपंच संदीप बानकर, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संदीप भुजबळ, मेरीटाईम बोर्डचे कार्यकारी अभियंता मनीष मेतकर, तहसीलदार विकास गंबरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री सामंत पुढे म्हणाले की, राजापुरातील साखरीनाटे, रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदर, दापाेलीतील हर्णे बंदर ही तीन बंदरे जिल्ह्यातील मच्छीमारांना ताकद देणारी बंदरे आहेत. हर्णे बंदराच्या विकासासाठी २०० कोटी याआधी मंजूर करण्यात आले आहेत. आता साखरीनाटे बंदरासाठी १५३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच मिरकरवाडा बंदराच्या विकासासाठी दुसऱ्या टप्प्यात शंभर कोटी रुपये देण्यात येतील. पुढच्या आराखड्यामध्ये येथील जोड रस्त्यासाठी निधी मंजूर केला जाईल. मच्छीमार महिलांना मच्छी सुकवण्यासाठी दोन्ही ओटे त्यांच्या मागणीनुसार मंजूर केल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.मंत्री सामंत म्हणाले की, विकासकामे करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. गडकिल्ले संवर्धनासाठी ३ कोटी, रस्त्यांसाठी ४ कोटी, मुख्यमंत्री सडक योजनेतून ५० किलोमीटरचे रस्ते राजापुरात मंजूर केले आहेत. राजापूर तालुक्यातील धरणाला पैसे देण्याचा आणि जामदा धरण डागडुजीचा निर्णयही घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

डिझेल काेटाबाबत निर्णय घेऊमच्छीमारांच्या डिझेल कोटा बंदसंदर्भात आपण स्वत: सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन चर्चा करेन. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असा शब्दही मंत्री सामंत यांनी दिला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajapurराजापुरUday Samantउदय सामंत