शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
2
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
3
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव; शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?
4
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
5
हिमेश रेशमियाला पितृशोक, गायकाच्या वडिलांचं ८७व्या वर्षी निधन
6
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
8
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
9
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
10
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
11
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
12
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
13
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
14
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
15
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
16
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
17
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
18
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
19
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
20
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई

भाजपला अपेक्षेप्रमाणे जागा मिळतील, रामदेवबाबांनी केलं भाकित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2022 1:38 PM

निवडणुकीत भारतीय जनता पक्ष रसातळाला जाईल, असे वक्तव्य काहींनी केले होते. मात्र असे काही होणार नाही

रत्नागिरी : पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल लवकरच समोर येणार आहेत. निवडणुकीत भारतीय जनता पक्ष रसातळाला जाईल, असे वक्तव्य काहींनी केले होते. मात्र असे काही होणार नाही तर भाजपला अपेक्षेप्रमाणे जागा मिळतील. केजरीवाल यांनाही चांगल्या कामाची पावती मिळेल. वास्तविक निवडणुका ही एक परीक्षा आहे. सर्व पक्षांना निवडणुकांच्या माध्यमातून आत्ममूल्यांकन करण्याची संधी असल्याचे प्रतिपादन रामदेवबाबा यांनी केले.महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र (पश्चिम) तर्फे रत्नागिरीत प्रात:कालीन योग शिबिर व प्रांतिक महिला संमेलन आयोजित करण्यात आले असून, त्यासाठी रामदेव बाबा रत्नागिरीत आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत मार्गदर्शन केले.गेली नऊ वर्ष मी ‘नि:पक्ष’ राहून कार्यरत असून, सर्वांचा आदर, सन्मान करीत असल्याचे सांगितले. अकरा वर्षांनंतर रत्नागिरी आलो असून, लोकमान्य टिळक व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना प्रथम अभिवादन केल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनानंतर दोन वर्षांनंतर रत्नागिरीत प्रथम कार्यक्रम होत आहे.गेली ४५ वर्षे मी योग करीत असून, ३० वर्षे लोकांकडून करवून घेत आहे.  २०० कोटी लोक योग करीत आहेत. देश आरोग्यदृष्ट्या शक्तिशाली व विश्वाचे अग्रगण्य राष्ट्र बनावे हा उद्देश आहे. शिक्षण, आरोग्य, आर्थिकदृष्ट्या भारत २०३५ पर्यंत संपन्न व्हावा, यासाठी योगाच्या माध्यामातून आपले प्रयत्न आहेत, असे त्यांनी सांगितले.महिला दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक कुटुंबात असाध्य व्याधींनी ग्रस्त रुग्ण आहेत.  नागरिकांना रोगमुक्त, नाशमुक्त, तंटामुक्त पाहण्याची इच्छा असून, योगाच्या माध्यमातून शक्य असल्याचे रामदेव बाबा यांनी यावेळी सांगितले.

उदय सामंत यांच्यामुळे जिल्ह्याचा भाग्योदय

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे चांगले काम करीत असून, रत्नागिरी जिल्ह्यात उदय सामंत यांच्यामुळे भाग्योदय होत आहे. केंद्रात चांगले काम सुरु असल्याने देशाच्या विकासासाठी सर्वांचे नक्कीच चांगले प्रयत्न आहेत. उदय सामंत राष्ट्र निष्ठा व योग निष्ठा प्रेमी असल्याचे सांगून त्यांचे वडील उद्योजक अण्णा सामंत यांनाही आपणासंबंधी आनंद, प्रेम असल्याचे रामदेवबाबा यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBJPभाजपाElectionनिवडणूक