शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

खळबळजनक! मुंबईचा सोने व्यापारी रत्नागिरीतून गायब, त्यांच्याजवळ सुमारे १० लाखांचे दागिने

By अरुण आडिवरेकर | Updated: September 21, 2022 12:08 IST

रत्नागिरीत ज्वेलर्सच्या दुकानात सोने चांदीचा माल विकण्यासाठी येतात. नेहमीप्रमाणे ते रत्नागिरीत आले होते.

रत्नागिरी : व्यावसायिक कामासाठी रत्नागिरीत आलेले मुंबईतील प्रसिद्ध सोने - चांदी व्यापारी कीर्ती कोठारी रत्नागिरी बाजारातून गायब झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोमवारी रात्रीपासून गायब झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकाराची माहिती रत्नागिरीत पसरताच एकच खळबळ उडाली आहे.मुंबई येथून व्यावसायिक कामासाठी सोने चांदीचे व्यापारी कीर्तिकुमार कोठारी (५५) हे राधाकृष्ण नाका येथून बेपत्ता झाले आहेत. कीर्तिकुमार हे मीरा भाईंदर येथील असून, ते रत्नागिरीत ज्वेलर्सच्या दुकानात सोने चांदीचा माल विकण्यासाठी येतात. नेहमीप्रमाणे ते रत्नागिरीत आले होते. आठवडा बाजार येथील एका लॉजमध्ये ते राहिले होते. सोमवारी रात्री ते एमजी रोड येथील एका ज्वेलर्सकडून राधाकृष्ण नाक्यापर्यंत चालत आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. मात्र, त्यानंतर त्यांचा पत्ता लागत नाही. यासाठी बाजारपेठेतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. त्यांच्याजवळ सुमारे १० लाखांचे दागिने होते, अशी चर्चा आहे.सोमवारी रात्रीनंतर नातेवाईकांचा त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांनी रत्नागिरीतील व्यापाऱ्यांजवळ  चौकशी केली. मात्र, कोणतीच माहिती मिळत नसल्याने त्यांनी थेट रत्नागिरी गाठली. कीर्तिकुमार यांचे नातेवाईकही त्यांचा शोध घेत असून, पोलिसांना  याबाबत माहिती देण्यात आली आहे. कीर्तिकुमार यांचे वास्तव्य ज्या लॉजमध्ये होते तिथे ते सोमवार पासून परत न आल्याचे सांगितले जात आहे. लॉजच्या खोलीत फक्त त्यांचे सामान आहे.रत्नागिरी येथील राम नाक्यात सोमवारी एका व्यावसायिकाला तिघांनी लुटले होते. तर मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शहरातील माळनाका येथे एका महिलेला लुटाण्यात आले. पाठोपाठ घडणाऱ्या लुटीच्या घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आता व्यावसायिकच गायब झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMissingबेपत्ता होणंCrime Newsगुन्हेगारी