शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
6
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
8
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
9
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
10
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
11
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
12
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
13
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
14
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
15
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
16
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
17
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
18
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
19
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
20
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा

बंदर विकासाला अडसर लालफितीचा

By admin | Published: March 19, 2015 9:29 PM

प्रश्न कायमच : अथर्संकल्पात होते तरतूद मात्र विकास नाहीच

रत्नागिरी : जिल्ह्यातील मच्छिमारांच्या अनेक समस्या आहेत. मच्छिमारांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा शासनाकडून नेहमीच दुर्लक्षित ठेवल्या गेल्या आहेत. या अथर्संकल्पात करण्यात आलेली तरतूद तुटपंूजी असल्यामुळे याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करुनही त्या पूर्ण झालेल्या नाहीत, अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये मच्छिमारांच्या सोयीसुविधांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यात मासे उतरवण्यासाठी ४३ बंदरांवर केंद्रे आहेत. यामध्ये राजापूर तालुक्यातील साखरीनाटे, दापोली तालुक्यातील हर्णै बंदर आणि रत्नागिरीतील मिरकरवाडा ही महत्त्वाची बंदरे आहेत. मासेमारी व्यवसायातून बंदरांवर कोट्यवधी रुपयांची उलाढाल होऊन परकीय चलन मिळते. मात्र, ही बंदरे असंख्य सोयीसुविधांपासून वंचित आहेत. हर्णै आणि साखरीनाटे बंदरावर गेल्या कित्येक वर्षांपासून जेटीची मागणी करण्यात आली आहे. तर मिरकरवाडा बंदराचा दुसरा टप्पाही रखडला आहे. आजच्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये मच्छिमारांच्या सोयीसुविधांसाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वीही अशा प्रकारे कोट्यवधी रुपयांच्या तरतूदी करण्यात आल्या होत्या. मात्र, जिल्ह्यातील मच्छिमारी बंदरावरील सोयीसुविधा पूर्ण झालेल्या नाहीत. तरतूदीतून यंदा तरी हर्णै, साखरीनाटे या बंदरांतील जेटीचा प्रश्न सुटेल का, तसेच मच्छिमारांच्या सोयीसुविधा देण्यात येतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्ह्यात बंदरांमध्ये दैन्यावस्था आहे. अशा ठिकाणी सुविधा निर्माण झाल्यास त्यातून उलाढाल वाढेल व मच्छिमार बांधवांना त्यातून सहाय्य मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. (शहर वार्ताहर)तिन्ही बंदरातील जेटींचा प्रश्न कायम रत्नागिरी जिल्ह्यातील बंदरांवर अनेकवेळा विविध प्रकारे निधीची घोषणा केली जाते. प्रत्यक्षात दर अर्थसंकल्पात तरतूद होते. हर्णै, नाटे या बंदरातील जेटीचा प्रश्न प्रलंबित असल्याने तेथे मासे उतरण्यासाठीही पेच निर्माण होतो. मात्र, त्याबाबत अनेकवेळा प्रयत्न करूनही विकासाच्या बाबतीत अनुशेष राहतो. वर्षानुवर्षांची ही बंदरांची रडकथा थांबणार कधी, असा प्रश्न परिसरातील मच्छिमार बांधव विचारत आहेत.