शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला,उत्तर विधानसभेत मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
6
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
7
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
9
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
10
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
11
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
12
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
13
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
14
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
15
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
17
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
18
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
20
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार

रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेनेच्या हक्काची, उदय सामंत यांनी व्यक्त केलं स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2023 11:34 AM

रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्गची जागा ही शिवसेनेची हक्काची जागा आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री हे वरिष्ठ नेते असून, ...

रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्गची जागा ही शिवसेनेची हक्काची जागा आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री हे वरिष्ठ नेते असून, त्यांना राज्याची भौगोलिक परिस्थिती माहिती आहे. त्यामुळे तेच या जागेबद्दल निर्णय घेतील, असे मत राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.मंत्री उदय सामंत शुक्रवारी (दि.६) रत्नागिरी दाैऱ्यावर आले हाेते. या दाैऱ्यात त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आपले मोठे बंधू किरण सामंत यांना नागरिकांचा पाठिंबा असून, आग्रहही आहे. त्यांनी लोकसभेत जावे, असे मलाही वाटत आहे. परंतु, निवडणुकीसाठी त्यांनी उभे राहावे की नाही, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.सध्या ते रत्नागिरीत मेळावे व शिवसेना पक्षप्रवेश कार्यक्रमात उपस्थित राहत आहेत, त्यामुळे ते शिवसेनेमध्येच आहेत. त्यांनी निवडणूक लढवली तर तीही शिवसेनेमधूनच असेल, असेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. कोणी या मतदारसंघावर दावा केला तरी शिंदे - फडणवीस - पवार हेच मतदारसंघांबाबत निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.

आरोग्याचा प्रश्न निकाली निघेलनांदेड दुर्घटनेचे समर्थन करता येणार नाही. या प्रकारानंतर आपण तातडीने रत्नागिरी व रायगडमधील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनीही सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून भेटी देण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय झाले पाहिजे, असे स्वप्न आहे. ते पूर्ण होण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्याचा मोठा प्रश्न निकाली निघेल, असे मंत्री सामंत म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे घरात बसून काम करत नाहीतमुख्यमंत्री शिंदे यांचे आरोग्याच्या क्षेत्रात मोठे काम आहे. ते घरात बसू काम करत नाहीत किंवा कोणतेही आदेश फेसबुक लाइव्ह करीत नसल्याचा टोला मंत्री सामंत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. शिंदे व ४० आमदारांवर गद्दार व खोके घेतल्याचा आरोप केला जातो, मग उद्धव ठाकरेंनी आता अजितदादा गद्दार आहेत, की खोके घेतले तेही एकदा जाहीर करावे, असे आव्हानही दिले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतUddhav Thackerayउद्धव ठाकरेlok sabhaलोकसभाShiv Senaशिवसेना