शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पांढरा समुद्र ते मिऱ्या बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 17:24 IST

पांढरा समुद्र ते मिऱ्या मोरटेंभे बंधाऱ्याचे काम करत असताना येथील पूर्ण भागाचे संरक्षण होईल, यातून येथील पर्यटनाचा विकास होऊन रोजगार निर्मिती होईल, याचा विचार करुन या बंधाऱ्याचे काम करा. तसेच ते लवकरात लवकर पूर्ण करा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी दिले.

ठळक मुद्देपांढरा समुद्र ते मिऱ्या बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करापर्यटनाचा विकास होऊन रोजगार निर्मिती होईल-मंत्री उदय सामंत यांची बैठकीत सूचना

रत्नागिरी : पांढरा समुद्र ते मिऱ्या मोरटेंभे बंधाऱ्याचे काम करत असताना येथील पूर्ण भागाचे संरक्षण होईल, यातून येथील पर्यटनाचा विकास होऊन रोजगार निर्मिती होईल, याचा विचार करुन या बंधाऱ्याचे काम करा. तसेच ते लवकरात लवकर पूर्ण करा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी दिले.अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे पांढरा समुद्र ते मिऱ्या मोरटेंभे बंधाराबाबतच्या येथील ग्रामस्थ आणि संबंधित अधिकारी यांच्यासमवेत सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी बोलत होते.

यावेळी रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती महेश म्हाप, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, प्रांताधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी, पतनचे कार्यकारी अभियंता एस्. ए. हुनरेकर, सहाय्यक अभियंता एस्. ए. चौधरी, मत्स्यविभागाचे देसाई यांच्यासह मुरुगवाडा, मिऱ्या, सडामिऱ्या येथील ग्रामस्थ उपस्थित होते.पांढरा समुद्र ते मिऱ्या मोरटेंभे हा साडेतीन किलोमीटरचा बंधारा असून, महाराष्ट्रातील मोठा धूप प्रतिबंध प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम उत्तम गुणवत्तेसोबत जिल्ह्याच्या निसर्ग सौंदर्यात व पर्यटन विकासात भर टाकणारा आहे.

या प्रकल्पाचे काम दिमाखदार झाले पाहिजे. या कामामध्ये लागणाऱ्या वेगवेगळ्या परवानग्यांसाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असेही यावेळी सामंत म्हणाले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरीMirkarwada Bandarमिरकरवाडा बंदर