शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

रत्नागिरी जिल्ह्यात आघाडीतील मारामारीत काँग्रेसच्या ‘हाता’त काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 6:12 PM

तीन विधानसभा मतदारसंघांची मागणी

रत्नागिरी : जिल्ह्याच्या राजकारणात गेली ३० वर्षे फारसा प्रभाव दाखवू न शकलेल्या काँग्रेसने महाविकास आघाडीकडे जिल्ह्यातील पाचपैकी राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूण अशा तीन विधानसभा मतदारसंघांची मागणी केली आहे. उद्धव सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या या जिल्ह्यात आघाडी म्हणून काँग्रेसच्या ‘हाता’त काय पडणार, असाच प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.एकेकाळी जिल्ह्यात सर्व प्रकारच्या राजकारणात दबदबा असलेल्या काँग्रेसला शिवसेनेचा उदय झाल्यानंतर उतरती कळा लागली. १९९० साली राजापूर विधानसभा मतदारसंघात ॲड. ल. रं. हातणकर विजयी झाले, तो खऱ्या अर्थाने काँग्रेसचा पक्ष म्हणून जिल्ह्यातील शेवटचा विजय होता. त्यानंतरच्या काळात गणपत कदम (राजापूर) आणि सुभाष बने (संगमेश्वर) या दोघांनी काँग्रेसचे आमदार म्हणून विजय मिळवला असला तरी त्यात पक्षापेक्षा त्यांचा वैयक्तिक आणि त्यातही कोकणचे नेते नारायण राणे यांचा हातभार मोठा होता. या दोघांच्या विजयाच्या आधारे काँग्रेसला फार मोठी उभारी घेता आली नाही.

१९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसने वेगळी चूल मांडल्यानंतर जिल्ह्यात काँग्रेस अधिकच क्षीण झाली. १९९९, २००४ आणि २००९ अशी सलग १५ वर्षे राज्यातील सत्ता काँग्रेस आघाडीकडे होती. पण, या काळातही जिल्ह्यात काँग्रेसला उभारी घेता आली नाही. त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात चांगले स्थान मिळवले. शिवसेनेच्या खालोखाल राष्ट्रवादीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि विधानसभेच्या पटलावरही आपला प्रभाव दाखवला.गेल्या काही वर्षांत हुस्नबानू खलिफे आणि जमीर खलिफे यांच्या रुपाने राजापुरात काँग्रेस टिकून आहे. त्याच्या खेरीज चिपळूण शहरात काँग्रेसने आपले अस्तित्व टिकवले आहे. अन्य कोठेही काँग्रेसची ताकद फार मोठी नाही. अर्थात राजापूर आणि चिपळूणच्या ग्रामीण भागातही शिवसेनेचे वर्चस्व कायमच अबाधित राहले आहे. त्यामुळेच १९९० नंतर पक्ष म्हणून काँग्रेसला कधीही विजय मिळाला नाही. हातणकर यांचा विजय त्यांची वैयक्तिक निष्कलंक प्रतिमा आणि तळागाळात रुजलेव्या काँग्रेसचा होता. त्यानंतर काँग्रेसला ते जुने दिवस कधीही दिसलेले नाहीत.आता महाविकास आघाडीच्या निमित्ताने निम्मी शिवसेना आणि निम्मी राष्ट्रवादी सोबत असल्याने काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाचपैकी तीन मतदारसंघ मिळावेत, अशी आग्रही मागणी काँग्रेसने केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीvidhan sabhaविधानसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेस