शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

संगणक परिचालकांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू

By admin | Published: March 02, 2015 11:04 PM

अजूनही बेदखलच : राज्य पातळीवरील आंदोलनाची रत्नागिरीतही नांदी, थकित मानधनासाठी नव्याने लढा

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेतर्फे राज्यभर उपोषणास प्रारंभ झाला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर जिल्ह्यातील संगणक परिचालक उपोषणास बसले आहेत.नोव्हेंबरपासून संगणक परिचालकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु केले होते. डिसेंबरमध्ये संगणक परिचालकांनी उपोषण केले होते. याचा राग ठेवत महाआॅनलाईन कंपनीने राज्यातील चार हजार संगणक परिचालकांचे सेवा करार रद्द केले होते. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांच्यासमवेत संगणक परिचालकांची सकारात्मक चर्चा झाल्यानंतरच उपोषण मागे घेण्यात आले होते. संप काळातील सेवा करार रद्द करण्यात आलेल्या सर्व संगणक परिचालकांना पुन्हा संधी देण्यात येईल तसेच संप काळातील अपूर्ण काम पूर्ण केल्यानंतर संप काळातील मानधन तसेच मागील महिन्यांचे थकित मानधन अदा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. गिरीराज यांनी महाआॅनलाईन कंपनीला दि. ९ जानेवारी २०१५ रोजी लेखी पत्रान्वये सूचना करूनसुध्दा अद्याप सेवा करार पुनस्थापीत केलेले नाहीत. शिवाय केलेल्या कामाचा मोबदलाही अदा केलेला नाही. याबाबत राज्य संगणक परिचालक संघटनेने ४ फेब्रुवारी २०१५ च्या पत्राद्वारे संबंधित बाब निदर्शनास आणून दिली होती. मात्र तरीही महाआॅनलाईन कंपनीने त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.शिवाय शासनदेखील कंपनीला पाठीशी घालत संगणक परिचालकांची फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. याकरिता पुन्हा एकदा काम बंद आंदोलन व बेमुदत उपोषणाचा निर्णय संघटनेने घेतला असून जिल्ह्यातील सर्व संगणक परिचालक जिल्हा परिषदेसमोर उपोषणास बसले आहेत.आजपर्यंत केलेल्या मागण्यांकडे शासनाने लक्ष न दिल्याने पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय डाटा एन्ट्री आॅपरेटर्सच्या संघटनेने राज्यस्तरावर घेतला आहे.(प्रतिनिधी)आज होणार पुन्हा चर्चा...डाटाएंट्री आॅपरेटर्सनी जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरिश जगताप यांच्याशी सायंकाळी उशिरा चर्चा केली. या बैठकीनंतर डाटाएंट्री आॅपरेटर्सनी उपोषण पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, उद्या मंगळवारी जिल्हा परिषदेसह कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुनच उपोषण सुरु ठेवायचे की नाही, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. ठेकेदार कंपनीकडून वारंवार फसवणूक होत असल्याची तक्रार.वारंवार आंदोलने करूनही शासन केवळ आश्वासने देत असल्याने पुन्हा बेमुदत उपोषण सुररू करण्याचा निर्णय.कामाचा मोबदलाही वेळेवर मिळत नसल्याने आॅपरेटर्समध्ये नाराजी.संप काळातील अपूर्ण काम जादा सेवा पूर्ण करून केल्यानंतर त्याचे जादा मानधन न दिल्याने आॅपरेटर्स संतप्त.