शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Ratnagiri: पावसाअभावी पिके सलाईनवर, शेतकऱ्यांचे स्वप्न करपणार

By मेहरून नाकाडे | Updated: September 2, 2023 18:37 IST

ढगाळ हवामानामुळे कीडरोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता

रत्नागिरी : पावसाने दडी मारल्याने पावसाअभावी जिल्ह्यातील पिके सध्या सलाईनवर असून पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांचे स्वप्न करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शुक्रवारी रात्री जिल्ह्यातील काही भागात पाऊस झाला असला तरी अन्यत्र मात्र शनिवारी दिवसभर ढगाळ हवामान होते. वरकस व कातळावरील भात पिके पाण्याअभावी पिवळी पडली आहेत.यावर्षी एकूणच पाऊस कमी झाला आहे. जिल्ह्याचे मुख्य पिक भात असून ६८ हजार ८८.३७ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्याचे उदिद्ष्ट असताना ६१ हजार २४९.१३ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष लागवड करण्यात आली आहे. नाचणी लागवड १० हजार ३९८ .२१ हेक्टर क्षेत्रावर अपेक्षित असताना प्रत्यक्ष लागवड ९३७९.६८ हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली आहे. तृणधान्य, तूर, मूग, उडीद व अन्य कडधान्य पिकाखालील लागवडही पावसाअभावी कमी झाली आहे. जिल्ह्यात ७९ हजार ८७१ .६५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्याचे उद्दिष्ट असताना ७१ हजार ११.०९ लागवड करण्यात आली आहे. पावसाअभावी पेरण्या लांबल्या शिवाय पावसावर ८२ टक्के लागवडीची कामे पूर्ण झाली. परंतु नंतर पाऊस गायब झाल्याने प्रत्यक्ष लागवड कमी झाली आहे.गेले काही दिवस कडकडीत उन पडत असल्याने भात खाचरे कोरडी पडली आहेत. नदीकाठच्या खाचरातीलही ओलावा नष्ट झाला आहे. मात्र वरकस व कातळावरील लागवडीला चांगलाच फटका बसला आहे. पावसाअभावी उन्हामुळे जमिनीतील ओलावा नष्ट होऊन जमिनीला भेगा पडल्या आहेत. रोपे पिवळी पडली आहेत. पिकांसाठी पाऊस गरजेचा आहे. काही भागात हळवे भात प्रसवले आहे. तर काही भागात फुलोरा स्वरूपात आहे.पावसाअभावी फुलोरा वाळण्याचा धोका आहे. शिवाय ढगाळ हवामानामुळे कीडरोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे. कडकडीत उन्हामुळे काही ठिकाणी करपा रोग पडला आहे. काही ठिकाणी पाने गुंडाळणारी अळी, निळे भुंगेरे, तपकिरी तुडतुड्यांचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे.

काही तालुक्यात भात, नाचणी पिकावर करपा रोग पडला आहे. सध्या पिकांसाठी पाऊस गरजेचा आहे. पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांनी जमेल तसे पाणी देण्याची व्यवस्था करावी. पिकांचे वेळोवेळी निरीक्षण करून कीडरोग नियंत्रणासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. - सुनंदा कुऱ्हाडे, कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी, रत्नागिरी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसFarmerशेतकरी