शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

गणपतीपुळ्यात मुंबई, पुण्याचीच गर्दी; अन्य भागातील पर्यटकांची प्रतीक्षाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 11:50 IST

निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर पर्यटकांची संख्या वाढेल असा अंदाज

रत्नागिरी : प्रचंड उष्मा आणि त्यात लाेकसभा निवडणुकीची धामधूम यामुळे सुटीचा हंगाम सुरू हाेऊन अजूनही रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे क्षेत्री येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांची संख्या घटली आहे. सध्या गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये मुंबई, पुण्यातील पर्यटकांची संख्या अधिक आहे. दिवसभरात आठ ते दहा हजार लोक ‘श्रीं’चे दर्शन घेत आहेत.दरवर्षी सर्वसाधारण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पर्यटकांची रेलचेल सुरू हाेते. गणपतीपुळेमध्ये सर्वाधिक पर्यटक मुंबई-पुण्यासह बेळगाव, कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रातून येतात. दरवर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला हा पंधरा ते वीस हजार पर्यटक गणपतीपुळे येथे हजेरी लावतात. मात्र, यावर्षी यामध्ये घट झाली आहे. वाढते तापमान आणि त्यातच लाेकसभा निवडणूक यामुळे पर्यटकांची संख्या राेडावल्याचे सांगण्यात येत आहे.मे महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात तिसऱ्या टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडल्याने पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक आलेले नाहीत. काेकणात निवडणुकीसाठी आलेल्या मुंबई, पुण्यातील नागरिकांनी गणपतीपुळेला भेट दिली. मुंबई व पुण्यात चाैथ्या टप्प्यात १३ मे राेजी मतदान हाेणार असल्याने ही मंडळी पुन्हा रवाना झाली आहे.उन्हाच्या कडाक्यामुळे बहुसंख्य पर्यटक थंड हवेच्या ठिकाणी फिरायला बाहेर पडत आहेत. रात्री प्रवास करून दिवसा विश्रांती घेण्यावर अनेकांचा भर आहे. समुद्रकिनारीही उन्हाचा कडाका असल्याने पर्यटकांची संख्या कमी आहे. निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर पर्यटकांची संख्या वाढेल, असा अंदाज आहे.

पर्यटकांची संख्या कमीचमे महिन्याच्या सुटीमध्ये येणाऱ्या पर्यटकांवर गणपतीपुळेतील व्यावसायिकांची उलाढाल होत असते. मात्र, सध्या उकाडा प्रचंड असल्याने पर्यटक येण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे अजूनही पर्यटकांची संख्या कमी आहे. निवडणुकांचा कालावधी संपला की, पर्यटक वाढतील, असा अंदाज व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtourismपर्यटनGanpatipule Mandirगणपतीपुळे मंदिर