शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

रत्नागिरीत रमजान ईद पर्यंत शहराला दररोज पाणी पुरवठा

By मेहरून नाकाडे | Published: April 19, 2023 5:28 PM

संभाव्य पाणीटंचाईची झळ नागरिकांना बसू नये, यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा

रत्नागिरी : मुस्लिम भाविकांच्या पवित्र रमजान मासची लवकरच सांगता होणार असून रमजान ईद शनिवार दि.२२ रोजी साजरी होणार आहे. रमजान ईद निमित्त शहरातील पाणीपुरवठा ईदपर्यंत दररोज करण्याच्या सूचना मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिल्या आहेत. यामुळे मुस्लिम बांधवांतूनच नाही तर शहरवासियांमध्ये समाधान व्यक्त हाेत आहे.भारतीय हवामान विभागाने दक्षिण पॅसिफिक महासागरातील ‘अल् निनो’ या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेमुळे देशातील मान्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहराला केवळ शीळ या एकमेव धरणातून पाणीपुरवठा सुरू आहे. बाष्पीभवनामुळे शीळ धरणातील पाणीसाठा प्रचंड वेगाने कमी होत आहे. सद्य:स्थितीत धरणात केवळ दि. ६ जूनपर्यंत पुरेल इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

शहरात साडे दहा हजार नळजोडण्या असून शहरासाठी दररोज १८ ते १९ दक्षलक्षधनमीटर पाणी पुरवठा होतो. मात्र ‘अल् निनो’च्या प्रभावामुळे संभाव्य पाणीटंचाईची झळ नागरिकांना बसू नये, यासाठी रविवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.मुस्लिम भाविकांचा रमजान ईद सण तोंडावर असून तयारी सर्वत्र सुरू आहे. भाविकांची गैरसोय होवून नये यासाठी शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, माजी नगरसेवक सुहेल मुकादम, मुसा काझी, बाळू साळवी, निमेश नायर, सामाजिक कार्यकर्ते बारक्या हळदणकर, उमर  गालिब मुकादम, जिब्रान तांडेल, करीम वस्ताव यांनी रमजान ईद निमित्त ईद पर्यंत पाणी ठेवण्यासाठी उद्योजक किरण सामंत यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याकडे मागणी केली. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मुख्याधिकारी बाबर यांनी मागणीला मान्यता देत ईदपर्यंत शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याची सूचना केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी