शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘बिपरजाॅय’चा गणपतीपुळे किनारपट्टीला तडाखा; अजस्त्र लाटामुळे दुकाने भुईसपाट, पर्यटक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 12:25 IST

सुमारे १० ते १२ फूट उंच उडणाऱ्या या लाटांमुळे किनाऱ्यावरील सर्व दुकाने भुईसपाट

गणपतीपुळे : बिपरजाॅय चक्रीवादळाचा प्रभाव किनारपट्टी भागात कायम आहे. श्रीक्षेत्र गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) येथे सलग तीन दिवस लाटांचे तांडव सुरू असून, रविवारी (दि. ११ जून) सायंकाळी ५:३० वाजण्याच्या दरम्यान अजस्त्र लाटा किनाऱ्यावर धडकल्या. सुमारे १० ते १२ फूट उंच उडणाऱ्या या लाटांमुळे किनाऱ्यावरील सर्व दुकाने भुईसपाट झाली. तर लाटेबराेबर १० ते १५ पर्यटक किनाऱ्यावरील धक्क्यावर आपटून जखमी झाले आहेत. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही.शाळा, महाविद्यालये चालू आठवड्यात सुरू हाेत असल्याने उन्हाळी सुटीचा शेवटचा रविवार असल्याने गणपतीपुळे येथे पर्यटकांची गर्दी झाली हाेती. दिवसभरात सुमारे २० हजार पर्यटक गणपतीपुळे येथे येऊन गेल्याची नाेंद ‘श्रीं’च्या मंदिरात झाली आहे. सायंकाळी ओहाेटीमुळे पर्यटक बिनधास्त हाेते; मात्र सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमाराला समुद्राने राैद्ररूप धारण केले आणि अजस्त्र लाटा उसळल्या.अचानक समुद्राचे पाणी वाढल्याने पर्यटकांची धावाधाव सुरू झाली. गणपतीपुळे समुद्र चौपाटीवर बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीवरून गणपतीपुळे मोरया चौक ते रेस्ट हाऊस रस्त्यावर जोराने लाटा आदळत हाेत्या. अजस्त्र लाटेने अनेक महिला पर्यटकांच्या पर्स वाहून गेल्या, तर अनेकांचे मोबाइलही पाण्याने गिळंकृत केले.

या लाटेच्या तडाख्याने जखमी झालेल्या पर्यटकांना औषधोपचारासाठी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच जयगड पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक जयदीप खळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप साळवी, पोलिस कॉन्स्टेबल कुणाल चव्हाण, तसेच रत्नागिरी येथून बंदोबस्तासाठी आलेल्या पाेलिसांनी किनाऱ्यावर धाव घेतली. त्यांनी सर्व पर्यटकांना समुद्राच्या बाहेर काढले. पोलिसांसाेबत गणपतीपुळे ग्रामपंचायत, सुरक्षारक्षक, श्रीदेव गणपतीपुळे संस्थानचे सुरक्षारक्षक व ग्रामस्थांनी मदतकार्य केले.व्यापाऱ्यांची सतर्कतादाेन दिवसांपूर्वी माेठ्या लाटेने काही व्यावसायिकांचे नुकसान झाले हाेते. त्यामुळे किनाऱ्यावर सुमारे १५ स्टाॅलधारकांनी आपले स्टाॅल सुरक्षित ठिकाणी उभारले हाेते. त्यामुळे त्यांना फटका बसला नाही. मात्र, १० स्टाॅलधारकांचे स्टाॅल समुद्राच्या लाटेत भुईसपाट झाले.

मुलगा बालंबाल बचावला

समुद्राची लाट ज्या वेगाने येत हाेती, त्याच वेगाने परत जात हाेती. ही लाट परतत असताना एक मुलगा पाण्याबराेबर ओढला गेला. मात्र, जीवरक्षक व पर्यटकांनी त्याला पकडल्याने ताे बचावला. त्यानंतर ताे मुलगा खूप घाबरला हाेता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcycloneचक्रीवादळGanpatipule Mandirगणपतीपुळे मंदिर