शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

बेपत्ता कुटुंबातील तिघांना शोधण्यात दापोली पोलिसांना यश, एकाचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 17:23 IST

३ जुलै रोजी मुलांच्या अपहरणाची तर सुगंधा बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

दापोली : तालुक्यामधील विसापूर येथून एकाच कुटुंबातील बेपत्ता झालेल्या चौघांपैकी तिघांना शोधण्यात दापोली पोलिसांना यश आले आहे. अपहरण म्हणून दाखल झालेल्या दोन्ही मुलांना शोधण्यात पोलिसांना यश आल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, या कुटुंबातील भरत भेलेकर यांचा अजून शोध लागलेला नाही.३ जुलै रोजी मुलांच्या अपहरणाची तर सुगंधा बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. एकाच कुटुंबातून चौघे जण बेपत्ता झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात या प्रकरणाने खळबळ माजली होती. दापोली पोलिसांनी सर्व पोलिस ठाण्यांत याची माहिती दिली होती. त्यानुसार गुप्त माहितीच्या आधारे सुगंधा भेलेकर ही ठाणे परिसरात दोन मुलांसमवेत असल्याची माहिती उपलब्ध झाली. त्यानुसार दापोलीचे पोलिस अंमलदार विकास पवार यांनी ठाणे येथे या तिघांवर नजर ठेवण्यासाठी सापळा रचला होता.सकाळी ठाणे दापोली या बसमध्ये हे तिघे जण बसल्याचे सूत्रांकडून विकास पवार यांना समजले. त्यानुसार त्यांनी सदर गाडीचा बसचालक व वाहक यांचे तत्काळ नंबर मिळवून कोणतीही शंका येणार नाही, याची काळजी घेऊन या तिघांवर लक्ष ठेवण्याबाबत सांगितले. सदर गाडी पालगड या ठिकाणी आली असता हे तिघे जण गाडीतून उतरल्याचे समजले.या गाडीच्या पाठोपाठ विकास पवार व त्यांचे अन्य साथीदार असल्याने या तिघांना ताब्यात घेऊन दापोली पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणात पोलिस अंमलदार विकास पवार तसेच पोलिसमित्र, पालगड येथील ग्रामस्थ तसेच अक्षय पवार, अनिकेत शिंदे, समीर जाधव, सुरेश शिंदे, सुयोग मोरे, एसटीचे कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे पोलिस अंमलदार विकास पवार यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMissingबेपत्ता होणंPoliceपोलिस