शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

कॉजवे होऊनही प्रश्न ‘जैसे थे’च

By admin | Published: March 02, 2015 11:02 PM

जिल्हा वार्षिक योजना : शासनाचे चौदा लाख रूपये पाण्यात

रत्नागिरी : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे आणि लोकप्रतिनिधींनी निधी दिल्यानंतर पाठ फिरवल्याने शासनाचे तब्बल १४ लाख रुपये पाण्यात गेले आहेत. राजापूर-जैतापूरदरम्यान रखडलेला कॉजवे झाला. मात्र, खाडीत येणाऱ्या भरती ओहोटीचा विचारच न केल्याने भरती आली की भर पावसाळ्याप्रमाणे कॉजवेवर दीड फूट पाणी चढते. त्यामुळे कॉजवे होऊनही भरती आणि ओहोटीची वेळ पाहूनच त्याचा वापर करावा लागत आहे.राजापूर - जैतापूरदरम्यान असलेल्या वहाळावरील कॉजवे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. देसाई वहाळावर जिल्हा परिषदेने बांधलेला लोखंडी साकव अत्यंत जीर्ण होऊन धोकादायक झाल्याने दळेचे माजी सरपंच विजय गोरिवले यांनी शासनाच्या पश्चिम घाट योजनेतून येथे छोट्या पुलाचे काम मंजूर करून घेतले होते. या पुलाची निविदा प्रक्रिया होऊन धनंजय चव्हाण नामक ठेकेदाराला कामाचा ठेका देण्यात आला होता. मात्र, शासनाने अचानक योजना गुंडाळल्याने हे काम होऊ शकले नाही. त्यानंतर विजय गोरिवले यांनी आमदार राजन साळवी यांना विनंती केली. आमदार साळवी यांनी सन २०१४/१५च्या जिल्हा वार्षिक योजनेतून साकव कार्यक्रमात या कॉजवेला मंजुरी मिळवली होती. हे काम होण्याबाबत ‘लोकमत’नेही वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानुसार या कॉजवेचे कामही सुरू झाले. मात्र, ठेकेदाराने खाडीच्या भरती ओहोटीचा विचारच केला नाही. त्यामुुळे या कामावरील पैसा पाण्यातच गेला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही अधिकाऱ्याने तसेच ज्यांनी या कामासाठी निधी दिला, त्या आमदार राजन साळवी यांनी या कामाकडे ढुंकूनही पाहिले नाही. केवळ निधी देऊन पाठ फिरवली. त्यामुळे आता एवढा पैसा खर्च करूनही प्रश्न कायम आहे.१४.१२ लाख खर्चाला प्रशासकीय मान्यता असलेल्या कामाचे १२ लाख ११ हजार ८४२ रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. खाडीच्या भरतीचं पाणी सुमारे दीड फूट कॉजवेवर येत असल्याने कॉजवे असूनही वाहतूक आणि रहदारी भरती ओहोटीची वेळ पाहूनच करावी लागते. कारण भरतीच्या वेळी हा कॉजवे सुमारे दीड फूट पाण्याखाली जातो. त्यामुळे दोन्ही भागांचा संपर्क तुटतोच शिवाय या मार्गावरील वाहतूकही भरती संपेपर्यंत खोळंबून राहाते. या कॉजवेवरून जाण्या-येण्यासाठी भरती ओहोटीचे वेळापत्रक पाहावे लागते. अशा कॉजवेवरून जाण्यापेक्षा जलप्रवास बरा, अशी प्रतिक्रिया सामान्य जनतेमधून उमटत आहेत.अतिवृष्टीत वहाळाचं पाणी साकवावरून जाणं हे ठीक आहे. मात्र खाडीच्या नियमित भरती ओहोटीचं पाणीदेखील या साकवावरून जावं, याबाबत परिसरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.यावर कॉजवेची उंची वाढवणे हा एकच पर्याय आहे. बांधकाम जनतेसाठी होत असल्याने त्याचा उपयोग जनतेसाठी व्हायला हवा आणि एवढा पैसा ओतूनही समस्या तशीच राहात असेल तर त्याचा उपयोग काय? असा सवाल आता ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. जनतेसाठी कामे करावी लागतात. त्यावेळी त्याच्यासाठीचे नियम आणि निकषांचा प्रश्न येतोच कुठे? असा सवाल विजय गोरिवले यांनी केला आहे. (प्रतिनिधी)