शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

रत्नागिरीतील आपत्ती व्यवस्थापन कक्ष अद्ययावत करणार : पालकमंत्री उदय सामंत

By मनोज मुळ्ये | Updated: July 22, 2023 18:51 IST

१ कोटी रुपयांची तरतूद करणार

रत्नागिरी : अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळणे, वादळ अशा सर्वच प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष अत्याधुनिक असणे आवश्यक आहे. आपण रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती कक्षाचे डिजिटलायझेशन करण्याच्या सूचना दिल्या असून, त्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.शनिवारी रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री सामंत यांनी सकाळच्या सत्रातच या कक्षाला भेट देऊन पाहणी केली. इर्शाळवाडीतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्षाला अधिक महत्त्व आले आहे. कोठेही आपत्ती ओढवते तेव्हा या कक्षाकडूनच सर्व गोष्टींचे नियंत्रण केले जाते. त्यासाठी येथील संपर्क यंत्रणा सर्वाधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे त्याचे डिजिटलायझेशन गरजेचे आहे. या कक्षाकडून प्रत्येक तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांच्याशी थेट संपर्क साधला जावा, यासाठी हॉटलाईनची व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अन्य संपर्क यंत्रणाही आधुनिक करण्याची गरज आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.या कामासाठी सुमारे १ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याने अधिकाऱ्यांनी त्याबाबत पुढाकार घेतला नव्हता. इतक्या मोठ्या निधीची तरतूद कशी होणार, असा त्यांच्यासमोरील प्रश्न होता. मात्र आता निधी उपलब्ध करण्याची जबाबदारी आपण घेतली आहे. त्यामुळे लवकरच हे काम हाती घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत