शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

सख्ख्या जावा उतरल्या एकमेकींच्या विरोधात, पावस ग्रामपंचायतीत ११ जागांसाठी निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 16:00 IST

Pawas gram panchyat Ratnagiri- रत्नागिरी तालुक्यातील पावस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एका प्रभागामध्ये दोन माजी सरपंच रिंगणात उतरले आहेत, तर एका प्रभागामध्ये दोन सख्ख्या जाऊबाई एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे आता निवडणुकीत रंगत आली आहे.

ठळक मुद्दे दोन माजी सरपंचही रिंगणात, शिवसेनेच्या उमेदवारामुळे अनेकजण नाराजअन्य कार्यकर्त्यांचा विचार होत नसल्याने अनेकजण नाराज, फटका बसण्याची शक्यता

पावस : रत्नागिरी तालुक्यातील पावस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एका प्रभागामध्ये दोन माजी सरपंच रिंगणात उतरले आहेत, तर एका प्रभागामध्ये दोन सख्ख्या जाऊबाई एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे आता निवडणुकीत रंगत आली आहे.शिवसेना-भाजप समोरासमोर लढत असताना, शिवसेनेच्या दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. २०१५ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना विरुद्ध गाव पॅनेल अशी लढत झाली होती. त्यावेळी शिवसेनेला जास्त जागा मिळूनही सरपंच पदाला मुकावे लागले होते. कमी जागा असलेल्या गाव पॅनेलचे सरपंच, उपसरपंच विराजमान झाले होते. अखेर आमदारांच्या शिष्टाईनंतर दोघांनी व इतर सदस्यांनी त्यावेळी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे सध्या शिवसेनेचे वर्चस्व आहे.पावसमधील ११ जागांसाठी आता निवडणूक होणार आहे. त्यातील प्रभाग एकमध्ये शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी सरपंच सुभाष पावसकर सरपंचपदाच्या आशेने रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेकडून आपण व आपली पत्नी यांनाच उमेदवारी मिळावी, यादृष्टीने प्रयत्न केले जातात.

आजपर्यंत ग्रामपंचायत सदस्य व जिल्हा परिषद सदस्य या दोन्ही गोष्टींमध्ये त्यांचीच मक्तेदारी झाल्यामुळे इतरांना संधी मिळत नसल्याने पक्षात नाराजी पसरली आहे. त्यामुळे युवासेनेच्या कार्यकर्त्याने भाजपच्या मदतीने निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.तसेच या प्रभागामध्ये नव्याने तेलीवाडी जोडल्यामुळे भाजपच्या माजी सरपंच व माजी पंचायत समिती सदस्य स्नेहगंधा साळुंखे पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर शिवसेनेच्या गुरव रिंगणात आहेत. हा प्रभाग पारंपरिक शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मात्र, मागील निवडणुकीत गाव पॅनेलच्या सदस्यांनी दणका दिला होता.

परंतु, येथील सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेनेचे पारडे जड झाले आहे. मागील निवडणुकीत गाव पॅनेलचे वर्चस्व असलेल्या प्रभाग ४ मध्ये शिवसेनेच्या विरोधात तीन उमेदवार उभे केले आहेत. त्यात शिवसेना व भाजपने दोन सख्ख्या जावांना एकमेकांसमोर उतरवले आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतRatnagiriरत्नागिरीPawasपावस