शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Ratnagiri: राजापूरसाठी स्थलांतर हाच पर्याय?, गेल्या दोन महिन्यांत शहराला पाच वेळा पुराच्या पाण्याचा वेढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 15:27 IST

विनाेद पवार राजा पूर : पावसाळा सुरू झाला की, राजापुरात पूर येताेच हे आता नित्याचे झाले आहे. पुराचे पाणी ...

विनाेद पवारराजापूर : पावसाळा सुरू झाला की, राजापुरातपूर येताेच हे आता नित्याचे झाले आहे. पुराचे पाणी शहरात शिरून दरवर्षी किमान सात ते आठ वेळा बाजारपेठ ठप्प होते. मात्र, या वर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून किमान पाच वेळा पुराच्या पाण्याने राजापूर शहर बाजारपेठेत शिरकाव केला आहे. गाळ उपसा केल्यानंतरही राजापूरची पूर समस्या कायम आहे. त्यातच शासनाच्या पाटबंधारे विभागाने दोन वर्षांपूर्वी शहराच्या पूररेषेत वाढ केल्याने आता या पूररेषामुक्तीतून व पूरमुक्तीतून सुटका होण्यासाठी संपूर्ण राजापूर शहराचे स्थलांतर हा एकमेव पर्याय ठरणार आहे.

साधारणत: १८७९ साली राजापूर बंदर गाळाने भरल्यानंतर राजापूर बंदरात येणारी जहाजे येणे बंद झाले व राजापूरच्या वैभवाला उतरती कळा लागली. तेव्हापासून राजापूर आणि पूर हे समीकरण बनत गेले आहे ते आजतागायत तसेच आहे. मात्र, १९८३ साली आलेल्या महापुराने राजापूर शहर जलमय झाले व शासनाने राजापूर शहरात पूररेषा अस्तित्वात आणली. शासनाने लागू केलेली पूररेषा राजापूर नगर परिषदेने १९९३ साली स्वीकारल्यानंतर शहरातील पूरग्रस्त नागरिकांचे पुनर्वसन शहराजवळील कोदवली ग्रामपंचायत हद्दीत करण्यात आले. मात्र, हे पुनर्वसन पूर्णत: अयशस्वी ठरले आहे.गतवर्षी राजापूर शहरातून वाहणाऱ्या कोदवलीसह अर्जुना नदीपात्रातील गाळ उपसा झाल्यानंतर पुराची तीव्रता कमी होईल, असे वाटत हाेते. गेल्या दोन महिन्यांच्या काळात राजापूर शहरात आजपर्यंत पाच वेळा पुराचे पाणी शिरून शहरवासीयांना नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. अद्यापही अजून अर्धा पावसाळा बाकी आहे. या वर्षी सर्वाधिक पूर हा जुलै महिन्यात आला असून, या महिन्यात चार वेळा पुराने राजापूर शहराला वेढा दिला आहे.

पावसाचा जोर वाढला की काेदवली व अर्जुना नद्यांच्या पाणी पातळीत वाढ हाेते आणि पुराचे पाणी शहरात शिरते. शहरात पाणी शिरले की शहरवासीयांना व्यापाराबरोबर अन्य वैयक्तिक नुकसानाला सामोरे जावे लागते. शहरातील संपूर्ण वाहतूक व्यवस्था व जनजीवन पुरामुळे विस्कळीत होते. त्यामुळे या पूरसमस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी गेल्या अनेक दशकांपासून करण्यात येत आहे. मात्र, या मागणीची पूर्तता न केल्याने अजूनही राजापूरकरांच्या डाेक्यावर पुराची टांगती तलवार कायम आहे. पुराच्या धाेक्यातून राजापूरकरांची सुटका कधी हाेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.वाढता धाेकापावसाचा जाेर वाढताच अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ हाेते. जुलै महिन्यात पाच वेळा नदीचे पाणी शहरात शिरले हाेते. शनिवारी (२७ राेजी) अर्जुना नदीची पाणी पातळी ५.४० मीटरपर्यंत पाेहाेचली हाेती. इशारा पातळीच्या वर पाणी पातळी पाेहाेचल्याने शहरातील जवाहर चाैकात पाणी आले हाेते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajapurराजापुरfloodपूर