शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दापोलीच्या रणांगणात अनिल परब-रामदास कदम यांचे शीतयुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 12:17 IST

निवडणुकीची सूत्रे आमदार योगेश कदम यांच्याकडून काढून माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे देण्याची अनिल परब यांची पहिली चाल यशस्वी झाली आहे. मात्र, त्यात नाराज झालेल्या शिवसैनिकांना सोबत घेत आमदार योगेश कदम आपली चाल खेळणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मनोज मुळ्ये

रत्नागिरी : दापोली आणि मंडणगडमधील नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री अनिल परब आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्यातील शीतयुद्ध रंगू लागले आहे. निवडणुकीची सूत्रे आमदार योगेश कदम यांच्याकडून काढून माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे देण्याची अनिल परब यांची पहिली चाल यशस्वी झाली आहे. मात्र, त्यात नाराज झालेल्या शिवसैनिकांना सोबत घेत आमदार योगेश कदम आपली चाल खेळणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दापोलीतील रिसॉर्टप्रकरणी केलेल्या पाठपुराव्याचा मोठा फटका पालकमंत्री अनिल परब यांना सहन करावा लागला. या साऱ्या प्रकरणात परब यांच्यावर शिंतोडे उडाले आहेत. सोमय्या यांना या रिसॉर्टबाबत माहिती पुरवण्यात शिवसेना नेते रामदास कदम यांचाच मोठा हात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी केला आणि त्यासाठी काही ऑडिओ क्लिपही सादर केल्या. त्यामुळे साहजिकच अनिल परब आणि रामदास कदम यांच्यामध्ये वितुष्ट आले आहे.

या प्रकरणात अनिल परब किंवा शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी कोणतीही बाजू मांडली नसली तरी या साऱ्यामध्ये शिवसेनेकडून रामदास कदम यांना दोषी मानण्यात येत असल्याचे दिसत नाही. त्यामुळेच विधान परिषदेच्या निवडणुकांमधून रामदास कदम यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. केवळ त्यांच्या आमदारकीला ब्रेक लावून न थांबता अनिल परब यांनी आता दापोली, मंडणगड नगरपंचायतीची मुख्य सूत्रे सूर्यकांत दळवी यांच्याकडे सोपवून पुढील चाल खेळली आहे.

२०१४ विधानसभेत पराभूत झाल्यानंतर दळवी यांनी आपल्या पराभवाला रामदास कदम यांनाच जबाबदार धरले होते. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकांमध्ये या जागी योगेश कदम यांची वर्णी लागली. त्यामुळे दळवी आणि रामदास कदम, तसेच दळवी आणि योगेश कदम यांच्यामध्ये सख्य नाही. शत्रूच्या शत्रूला मित्र मानण्याचा सिद्धांत येथे लागू झाला आहे. कदम यांच्यावर मात करण्यासाठी परब यांनी सूर्यकांत दळवी यांना जवळ केले आहे.

परब यांची ही चाल यशस्वी झाली असली तरी त्याने शिवसेनेचेच अनेक जण नाराजही झाले आहेत. अशा नाराजांची मोट बांधून योगेश कदम या निवडणुकीत आपले वजन दाखवणार का, असा प्रश्न आता पुढे आला आहे. आता ही लढाई दळवी विरुद्ध कदम, अशी प्रतिष्ठेची होणार असली तरी मुळात ही लढाई परब विरुद्ध कदम, अशीच आहे.

दळवी यांचे पुनरागमन

दापोलीत शिवसेना वाढवण्यात सर्वांत मोठा वाटा सूर्यकांत दळवी यांचा आहे. १९९० पासून सलग पाच निवडणुका जिंकण्याची मोठी कामगिरी दळवी यांनी केली आहे. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सूर्यकांत दळवी यांनी रामदास कदम यांच्यावर आरोप केले. त्यानंतर ते शिवसेनेत फारसे सक्रिय नव्हते. ते भाजपमध्ये जाणार, ते राष्ट्रवादीत जाणार, अशा अनेक चर्चा झाल्या. प्रत्यक्षात ते कोणत्याही पक्षात गेले नसले तरी शिवसेनेत मात्र सक्रिय नव्हते.

दोघांच्या भांडणार लाभ तिसऱ्याचा

परब आणि कदम यांच्यातील वादाचा लाभ सूर्यकांत दळवी यांना झाला आहे. दळवी आणि अनिल परब यांच्यात खूप चांगली मैत्री असल्याचे आजपर्यंत कधीही समोर आलेले नाही. पालकमंत्री झाल्यानंतर अनिल परब यांनी जुने शिवसैनिक म्हणून दळवी यांना पक्षात परत सक्रिय करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. मात्र, आता कदम यांना शह देण्यासाठी त्यांनी दळवी यांना पुढे आणले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDapoli Nagar Panchayatदापोली नगरपंचायतElectionनिवडणूकShiv SenaशिवसेनाRamdas Kadamरामदास कदमAnil Parabअनिल परब