शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

सरकार, दाद तुम्ही घ्या ना, रिफायनरी राजापूरला द्या ना, मेळाव्यात महिलांचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 13:39 IST

रिफायनरी प्रकल्पाची मुहूर्तमेढ राजापुरातच व्हावी यासाठी राजापूरवासीयांनी कंबर कसली आहे.

राजापूर : ‘सरकार दाद तुम्ही घ्या ना, रिफायनरी राजापूरला द्या ना’, असा एल्गार रविवारी राजापुरात रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ आयाेजित मेळाव्यात करण्यात आला. राजापूर शहरानजीकच्या धोपेश्वर येथील पाटीलमळा यशोदिनसृष्टी येथे आयाेजित केलेल्या या मेळाव्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय हाेती.

रिफायनरी प्रकल्पाची मुहूर्तमेढ राजापुरातच व्हावी यासाठी राजापूरवासीयांनी कंबर कसली आहे. तालुक्यातील विविध ५७ सामाजिक संघटना, १३० ग्रामपंचायती, सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत रिफायनरी प्रकल्प राजापुरातच व्हावा यासाठी रविवारी (६ मार्च) समर्थन मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याच्या ठिकाणी काेणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दंगल नियंत्रण पथक हजर होते.कोकणाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्हाला या रिफायनरी प्रकल्पाची नितांत गरज आहे. यापूर्वी काही एनजीओंच्या भुलथापांना बळी पडून नाणार येथील स्थानिकांनी प्रकल्पाला विरोध केला होता. मात्र, आता ती चूक आम्ही पुन्हा करणार नाही, असे स्पष्ट करत धोपेश्वर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी या समर्थन मेळाव्याला हजेरी लावली होती.रिफायनरी प्रकल्प समन्वय समिती राजापूर - धोपेश्वरचे कार्याध्यक्ष महेश शिवलकर यांनी रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्याला काय सुविधा मिळणार आहेत याची माहिती प्रस्ताविकामध्ये दिली. राजापूर शहराला भेडसावणाऱ्या पुराच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रकल्प कंपनीने राजापूर शहरातून वाहणाऱ्या कोदवली व अर्जुना या नद्यांमधील गाळ काढावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.रिफायनरी प्रकल्पातून निघणाऱ्या कार्बनडाय ऑक्साइड या वायूपासून कार्बन सीट बनवल्या जातात. ही ग्रीन रिफायनरी आहे, त्यामुळे यातून प्रदूषण होत नाही. पर्यावरणाची सर्व मानके या प्रकल्पामध्ये पाळली जातात अशी माहिती रिफायनरीचे अभ्यासक आशिष किर यांनी यावेळी दिली. रत्नागिरीतील फिनोलेक्स कंपनीच्या वेळीही एनजीओ आले होते. मात्र, आता ते कुठेही दिसत नाहीत. एनजीओंच्या माध्यमातून काही लोक समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचे काम करत आहेत. त्यांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असेही आशिष किर यानी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajapurराजापुर