शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला होता गोळीबार
2
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
3
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
4
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
5
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
6
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
7
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
8
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
9
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
10
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
11
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
12
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
13
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
15
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
16
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
17
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
18
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
19
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
20
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य

चांदेराईतील पूरग्रस्तांची पालकमंत्री उदय सामंतांची भेट; दुकानदार, टपरीधारकांना मिळणार भरपाई

By मनोज मुळ्ये | Published: July 29, 2023 10:06 AM

प्रत्येक दुकानदाराला प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे

रत्नागिरी : रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी सकाळी ७:३० वाजताच चांदेराई गावातील पूर परिस्थितीची  पाहणी केली. तब्बल ३६ तास येथील बाजारपेठेत पाणी असल्याने ७७ दुकानांचे नुकसान झाले असून, त्यांना प्रत्येकी ५० हजारांची तर छोट्या टपऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये भरपाई देण्याचे आश्वासन मंत्री सामंत यांनी दिले. 

यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. मंगळवारपासून संततधार कोसळणाऱ्या पावासामुळे गुरुवारी चांदेराई बाजारपेठेत पाणी शिरले. ते शुक्रवारी ओसरले.  पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी तेथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की, सुमारे ७७ दुकानांमध्ये पाणी शिरले होते. २ दिवस दुकानात पाणी शिरले होते.

त्यामुळे प्रत्येक दुकानदाराला प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. टपरीवाले आहेत त्यांना दहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्या ठिकाणी जमीन खचण्याच्या घटना घडल्या आहेत त्यांची देखील पाहणी करण्याच्या सूचना प्रांताधिकारी यांना दिल्या आहेत. चांदेराई नदीमधील गाळ यंदा काढण्यात आला होता. अजूनही येथे गाळ असून तो काढण्याची  ग्रामस्थांची मागणी आहे. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीमधून निधीची तरतूद करून सगळा गाळ काढण्यात येईल असे ते म्हणाले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतfloodपूर