शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

गडनदीचा श्वास कोंडला

By admin | Published: March 15, 2015 9:25 PM

खडसेंना निवेदन : गाळ उपसण्याची केली मागणी

आरवली : पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यांमुळे संगमेश्वर तालुक्यातील गडनदी व इतर नद्यांच्या विस्तारात वाढ होते. या नद्यांमध्ये गाळ साचल्याने बहुतांश शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. पुराच्या पाण्यामुळे व्यापारी वर्गाचे नुकसान होत असल्याने गडनदीसह तालुक्यातील नद्यांमधील गाळ उपसा करण्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी संगमेश्वर तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य जाकीर शेकासन यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे केली आहे. गडनदीचा सह्याद्रीच्या खोऱ्यातून उगम झाला आहे. कुंभारखाणी, मुरडव, आरवली, कोंडिवरे, माखजन यागावातून ही नदी करजुवे येथे अरबी समुद्राला मिळते. तसेच तालुक्यातून शास्त्री, सोनवी, असावी, अलकनंदा, काजळी, सप्तलिंंगी, बावनदी या अन्य नद्याही वाहतात. गडनदीमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पुराचा फटका आरवली आणि माखजन येथील बाजारपेठांना बसतो. तसेच अनेक गावांतील नदीकिनाऱ्यावरील शेती वाहून जाते. सखल भाग असल्याने पुराचे पाणी शेतीमध्ये थांबून शेती कुजण्याचेही प्रमाण मोठे असते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. २००५ आणि २०१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत माखजन भागात मोठ्या प्रमाणावर पुरामुळे नुकसान झाले होते. तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यावेळी गडनदीतील गाळ उपसा करण्यासाठी निधीची उपलब्धता करुन देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप निधी मिळाला नसल्याने गाळ उपशाचे काम झालेले नाही.धामणीकडून संगमेश्वरकडे वाहणाऱ्या नदीमुळे कसब्या जवळची शेती गिळंकृत केली आहे. धामणी, आंबेड खुर्द या भागातही नदीच्या काठावरील शेतीला धोका पोहचला आहे. शास्त्री आणि सोनवीच्या संगमाच्या पुढे असणाऱ्या गावांमध्ये तर नदीच्या बदलत्या प्रवाहाचा चांगलाच फटका शेतकऱ्यांना दरवर्षी बसत आहे. या नद्यांमध्ये जमा झालेला गाळ उपसा करावा, अशी गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे, पण याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नसल्याने व वर्षानुवर्षे असाच प्रकार सुरू राहिल्याने शेतकरी जनतेत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.धामापूर आणि काही भागात गडनदीच्या भरतीचे खारे पाणी शेत जमीन क्षेत्रात घुसत असल्यामुळे शेतीचे नुकसान होते. यामुळे खार जमीन प्रतिबंधक उपाय म्हणून या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याची आवश्यकता आहे. यासाठी बंदर खात्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे शेकासन यांनी सांगितले. (वार्ताहर)गाळात रूतल्या नद्या .....कोकणात चिपळूण, संगमेश्वर, खेड, दापोली, राजापूर अशा तालुक्यांमध्ये शहरात पुराच्या पाण्याचा फटका बसतो व त्यामुळे आर्थिक हानी पोहोचते. शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. अशा काळात सर्वच स्तरावर आपण ठप्प असतो. हे सारे प्रकार नित्याचेच होत असल्याने व या साऱ्यावर मात करण्यासाठी पूर्वीच्या सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची मागणी शेकासन यांनी केली आहे.