शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
लाडकी बहीण योजना कधीपर्यंत चालणार? रक्कम किती वाढणार?; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती
3
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
4
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
5
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
6
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
7
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
8
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
9
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
10
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
11
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
12
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
13
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
14
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
15
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
16
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
17
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
18
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
19
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
20
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर हापूस बाजारात दाखल, बदलत्या हवामानामुळे उत्पादनात घट; दर काय.. जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 1:03 PM

राज्याच्या अनेक भागांतून आंबा आल्याने वाशी मार्केटला आवक वाढली

रत्नागिरी : बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा पिकावर झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा काही भागांतच आहे. उष्म्यामुळे आंबा लवकर तयार होऊ लागल्याने बागायतदार आंबा काढून विक्रीला पाठवीत आहेत. त्यामुळे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर वाशी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर हापूस दाखल झाला.

बुधवारी वाशी मार्केटला ५० हजार पेट्या विक्रीला आल्या होत्या. गतवर्षी गुढी पाडव्याला वीस हजार पेट्या विक्रीला होत्या. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आवक अधिक असून, दर ५०० रुपयांनी कमी झाला आहे. सध्या पेटीला १५०० ते ४५०० रूपये दर मिळत आहे.यावर्षी पावसाळा बराच लांबला. त्यामुळे उशिरापर्यंत झाडांना पालवी येत राहिली. यावर्षी थंडीचे प्रमाण अत्यल्प होते. त्यामुळे फुलोरा पाहिजे तेवढा झाला नाही. जानेवारीतील थंडीमुळे झाडांना फुलोरा आला. मात्र, फळधारणा अपेक्षेइतकी झाली नाही. जिल्ह्यात पावस, राजापूर, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा अधिक आहे. मात्र, जिल्ह्याच्या अन्य भागांत आंबा नसल्याने बागायतदार चिंतेत आहेत. आंब्यावर कीडरोड, तुडतुडा, बुरशी, थ्रीप्सचा प्रादुर्भाव अद्याप आहे.फुलोरा आल्यापासून वानरांचा त्रास सुरू होतो. त्यामुळे राखणीसाठी नेपाळी बागेत ठेवले जातात. काही बागायतदारांकडे आंबाच नसल्याने कीटकनाशक फवारणीपासून राखणीसाठी केलेला खर्च भागविणे अशक्य होणार आहे.गुढी पाडव्याला मुहूर्तगुढी पाडव्याला मुहूर्ताची आंबा पेटी पाठवून कोकणातील बागायतदार आंबा विक्रीची सुरुवात करतात. दरवर्षी वाशी बाजार समितीत ५० ते ६० हजार पेट्या विक्रीला असतात. गतवर्षी हे प्रमाण कमी होते. २० हजार पेट्याच विक्रीला होत्या. यावर्षी पेट्या वाढल्या आहेत. अर्थात त्यात अजूनही कोकणातील आंबा कमी आहे.

आंबा हंगामाचे चित्रच वेगळे आहे. दरवर्षी सुरुवातीला आंबा कमी असतो. मात्र, यावर्षीही मोजक्याच बागायतदारांकडे आंबा आहे, अन्य बागायतदारांकडे कामच नसल्याने ते बसून आहेत. पाडव्याला राज्याच्या अनेक भागांतून आंबा आल्याने वाशी मार्केटला आवक वाढली होती. - राजन कदम, बागायतदार

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाweatherहवामानMarketबाजार