शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

बागायतीला अवकळा

By admin | Published: March 04, 2015 9:43 PM

खेड तालुका : अवकाळी पावसाने कंबरडे मोडले

खेड : चार दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे. खेड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे आंबा आणि काजूचे पीक नष्ट झाले आहे. पावसामुळे आंबा आणि काजू उत्पादनाला गळती लागल्याने यंदाचे आंबा व काजूपासून मिळणाऱ््या उत्पन्नाला मुकावे लागणार आहे. अशातच सुके गवत पाण्यात गेल्याने शेतकरी मात्र दुबार संकटात सापडला आहे़ शनिवारी सुरू झालेला पाऊस रविवारीदेखील कायम राहिला. रविवारी दुपारपासून पावसाने जोर धरल्याने अनेकांना आपले व्यवहार बंद ठेवावे लागले़ ऐन शिमगोत्सवामध्ये पावसाने संततधार लावल्याने शेतकऱ्यांचे तीनतेरा वाजले आहेत. होळीसाठी साठवून ठेवलेले सुके गवत आणि भारे या पावसामध्ये भिजल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.दोन दिवस कोसळलेल्या पावसाने केवळ सर्वसामान्यांचेच नव्हे, तर सर्वांच्याच तोंडचे पाणी पळवून लावले आहे. खेड तालुक्यातील भरणे, सुकिवली, सुसेरी, कोरेगाव, संगलट, पंधरागाव, धामणंद तसेच बहुतांश गावामधील शेतकऱ्यांची आंबा पिके या पावसाने नष्ट केली आहेत.करटेल गावासह सुकिवली, भरणे, खवटी आणि कशेडी अनेक काही शेतकऱ्यांनी जनावरांसाठी राखून ठेवलेला चारा पावसामध्ये भिजला. हा चारा आता जनावरे खात नाहीत. यामुळे हा चारा सडणार आहे़ सुक्या चाऱ्याखेरीज या शेतकऱ्यांकडे अन्य कोणत्याही प्रकारचा चारा नसल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. तालुक्यातील खाडीपट्टा आणि पंधरागाव धामणंद आणि भरणे, सुकिवली, खेड परिसरातील अनेक आंबा व काजूच्या बागांवर संकट ओढवले आहे. नुकताच आलेला अांबा पावसामध्ये भिजल्याने उत्पादनाला गळती लागली आहे.किरकोळ स्वरूपात असलेल्या आंबा बागायतदारदेख्ीाल आता चिंतेत सापडले आहेत़ ठिकठिकाणी आंब्याला गळती लागल्याने कोवळ्या आंब्याचे ढीग पाहावयास मिळत आहेत. काही झाडांना आलेला मोेहोरही गळून पडला आहे. काजूची अवस्था याहून वेगळी राहिलेली नाही. त्यामुळे अनेक बागायतदारांनी डोक्याला हात लावला आहे.या अस्मानी संकटानंतर हातातोंडाशी आलेली पिके पावसाने नासवल्याने बागायतदार चिंतेत आहेत. आता सरकारनेच याबाबत पुढाकार घेऊन कोकणातील आणि विशेषत: खेड तालुक्यातील या पिकांना संरक्षण देण्याची मागणी बागायतदारांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)अवकाळी पावसामुळे लाखो रूपयांचे काजूचे पीक हाताबाहेर गेले आहे. आता हे नुकसान कसे भरून काढणार? या पिकावर वर्षाचे अर्थार्जन होत होते. मात्र, आता पावसामुळे झालेले नुकसान भरून काढण्यापलिकडे गेले आहे.- मधुकर चाळके,काजू बागायतदार, सुकिवलीगेले दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे आंबा आणि काजू बागायतदार संकटात सापडला आहे. निसर्गाचे मोठे संकट आल्याने याचा सामना कसा करावा? असा पेच आमच्यासमोर निर्माण झाला आहे.- समीर जाधव,आंबा बागायतदार, कोरेगाव.अवकाळी पावसाने केला घात, जनावरांच्या तोेंडचा घासही घेतला काढून.राज्य शासनाने मदत करण्याची मागणी.भरणे, सुकिवली, सुसेरी, कोरेगाव, संगलट, पंधरागाव, धामणंद परिसरातील आंबा पिके पावाने केली नष्ट.