शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

Ratnagiri: रिफायनरी प्रकल्पाबाबत आशा बळावल्या, तीन देशांची एक संयुक्त समिती स्थापन केली जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 12:04 IST

..तर महाराष्ट्राला फटका

रत्नागिरी : देशाला पेट्रोकेमिकल उद्योगातील प्रमुख निर्यातदार बनवण्याची महत्त्वाकांक्षा असलेला रिफायनरी प्रकल्प गतीने मार्गी लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जी-२० परिषदेसाठी भारतात आलेले सौदी अरेबियाचे राजपुत्र आणि संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार तीन देशांची एक संयुक्त समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीच्या माध्यमातून प्रकल्प वेगाने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे प्रकल्प समर्थकांच्या आशा बळावल्या आहेत.राजकारण केले गेल्याने सुमारे चार लाख रुपयांची गुंतवणूक होणार असलेला हा प्रकल्प कोणत्याही हालचाली न होता तब्बल आठ वर्षे रखडत पडला आहे. मात्र, आता सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा प्रकल्प मार्गी लावण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी पश्चिम किनारपट्टीवरच उपयुक्त असल्याने नाणार, बारसूमध्ये हा प्रकल्प होईल, अशी आशा रिफायनरी समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे. तीन देशांची समिती या प्रकल्पासाठी पाठपुरावा करणार असल्याने हा रखडलेला प्रकल्प मार्गी लागण्याची अपेक्षा रिफायनरी समर्थक करत आहेत.

 

  • ६० दशलक्ष टन कच्च्या तेलावर प्रतिवर्षी होणार प्रक्रिया
  • २०१८ एप्रिलमध्ये, अरामकोने रत्नागिरी रिफायनरी ॲण्ड पेट्रोकेमिकल कंपनीशी भागीदारी करण्यासाठी केला प्राथमिक करार.

देशाची महत्त्वाकांक्षाभारतात पेट्रोलियम इंधन, उत्पादने, पेट्रोकेमिकल्स उत्पादने यांची मागणी अधिक आहे. त्यामुळे सद्यस्थितीत भारत हा कच्च्या तेलाच्या आयातीतील जगातील तिसरा सर्वांत मोठा ग्राहक आहे. येत्या काही वर्षात या उत्पादनांची मागणी अनेक पटींनी वाढणार आहे. त्यामुळे त्यात स्वयंपूर्णता येण्यासाठी महा रिफायनरी प्रकल्पाची गरज आहे. पुढील काही वर्षांत भारताची तेल शुद्धीकरण क्षमता सध्याच्या २५० दशलक्ष टनवरून ४५० दशलक्ष टनपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळेच या प्रकल्पावर आता केंद्र सरकारकडून अधिक लक्ष दिले जाण्याची शक्यता आहे.

...तर महाराष्ट्राला फटकाया प्रकल्पासाठी पश्चिम किनारपट्टीवरच जागेची गरज आहे. जर नाणार, बारसूमध्ये हा प्रकल्प झाला नाही तर तो पश्चिम किनारपट्टीवरील अन्य राज्यात नेला जाईल. मात्र, तसे झाल्यास तब्बल चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रातून बाहेर जाईल. एका बाजुला बेरोजगारी वाढत असताना असा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणे अधिक त्रासदायक ठरणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीnanar refinery projectनाणार प्रकल्प