शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

महापुरातील वाहनांचे नुकसान कसे भरून निघणार; महाडमध्ये वाहनांच्या दुरुस्तीला रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 19:26 IST

रस्त्यावर असलेली वाहने एकमेकावर आपटली. अनेक वाहने गटारात वाहून गेली. कार आणि मोटारसायकल दोन्ही प्रकारची वाहने यामध्ये बाधित झाली.

- सिकंदर अनवारे

दासगाव: महाडमध्ये आलेल्या महापुरात शहरातील प्रत्येक वाहन पुराच्या पाण्यात अडकले. वाहनांची पाण्याच्या प्रवाहात पडझड झाल्याने नुकसान देखील झाले. वाहनांची दुरुस्ती करण्यासाठी महाडमध्ये रांगा लागल्या आहेत. काही गॅरेज चालक फ्रि सेवा देत आहेत. महाडमध्ये आलेल्या पुराने संपूर्ण शहरात हाहाकार माजवला. यामुळे मोठ्या प्रमाणात तालुक्यात जीवितहानी आणि शहरात वित्तहानी झाली आहे. शासकीय मालमत्तेचे देखील या पुरात नुकसान झाले आहे. शहरात असलेल्या वाहनांची तर पुराच्या पाण्याच्या प्रवाहात वाताहत झाली. रस्त्यावर असलेली वाहने एकमेकावर आपटली. अनेक वाहने गटारात वाहून गेली. कार आणि मोटारसायकल दोन्ही प्रकारची वाहने यामध्ये बाधित झाली.

पुराच्या पाण्यात किमान दोन दिवस ही वाहने तशीच राहिली त्यातच मोठ्या प्रमाणावर चिखल असल्याने हा चिखल वाहनांच्या विविध भागात जावून साचला. यामुळे इलेक्ट्रोनिक यंत्रणा बंद पडल्या आहेत. गाडीतील सीट कव्हर, रुफ कव्हर, हॉर्न, इंधन टाक्या, हेडलाईट, ब्रेक, ई.सी.एम, वायरिंग, सेन्ट्रल लॉकिंग, क्लच प्लेट, आदी भाग नादुरस्त झाले आहेत. त्यातच कांही वाहनांना विमा कव्हर असल्याने अनेकांनी वाहने कांही दिवस तशीच ठेवली आहेत त्यामुळे वाहनांचे अधिक नुकसान झाले आहे.

महाड शहरात साधारणपणे छ.शिवाजी चौक, काकरतळे, सुकटगल्ली, मुख्य बाजारपेठ, आदी भागात कांही प्रमाणात पुराचे पाणी येते. सन २००५ मध्ये छ.शिवाजी चौक ते एस.टी.स्थानक मार्गावर देखील साधारण एक फुट पाणी आले होते. त्यातच महाडमधील नवेनगर परिसरातील शासकीय धान्य दुकान गोदाम, महाड तहसील कार्यालय (कोट आळी), महाड एस.टी.स्थानक, छ. शिवाजी मार्ग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, चवदारतळे या परिसरात पुराचे पाणी शक्यतो येत नाही.

दरवर्षाचा हा अनुभव असल्याने यावर्षी देखील दिवसभर आलेल्या पुराच्या पाण्याआधी नागरिकांनी आपली वाहने याठिकाणी आणून ठेवली. मात्र हा अनुभव यावेळी मात्र फिका पडला. पुराच्या पाण्याने वाहनांना देखील सोडले नाही. कांहीजणांनी कर्ज काढून वाहने घेतलेली होती तर कांहीनी सेवानिवृत्त होत कुटुंबाची आवड म्हणून आवडीचे वाहन घेतले होते. प्रत्येकाने आपली गरज ओळखत वाहने घेतली मात्र आवडीच्या वाहनावर पुराने पाणी फिरवले. वाहनांची अवस्था पाहून अनेकांचे चेहरे रडवेले झाले आणि वाहनांचे हे नुकसान कसे भरून काढायचे असा प्रश्न प्रत्येकाला पडला.

वाहने घेताना आपण विमा काढलाच पाहिजे मात्र महाड मधील गेली कांही वर्षाची स्थिती पाहता सातत्याने पुराच्या पाण्यात वाहने जात आहेत. यामुळे विमा कंपन्या देखील आता येथील उत्पन्न आणि द्यावा लागणारा मोबदला याचा विचार करेल. भविष्यात आपली वाहने पूर परीस्थिती पाहता वाहन कसे सुरक्षित राहील याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे – ललित खातू विमा सल्लागार महाड

वाहन पुराच्या पाण्यात गेल्याने वाहनाच्या प्रत्येक भागात चिखल गेला आहे. यामुळे संपूर्ण वाहन खोलून चिखल पाणी काढून टाकणे हे मुख्य काम आहे. वाहनातील इलेक्ट्रोनिक पार्ट यामध्ये शक्यतो खराब होतात. यामुळे नवीन टाकणे उत्तम असते. पूर्ण दुरुस्तीनंतर वाहन पुन्हा रस्त्यावर धावेल – विनोद कातरे शिंदे मोटर्स महाड

टॅग्स :Ratnagiri Floodरत्नागिरी पूरbikeबाईकcarकारRainपाऊस