शहरं
Join us  
Trending Stories
1
"आचारसंहिता लागेपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्या अन्यथा…’’ मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
2
गुजरातमध्ये भिंत कोसळल्याने ७ मजूरांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
3
"...यासाठी आयुष्यातील २२ वर्षे खपवली नाही"; पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात व्यक्त केली खंत
4
"..आता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही का?", १७ जातींच्या समावेशावरून जरांगे पाटलांचा सवाल
5
अनोखी क्रिकेट स्पर्धा रिटर्न! ६ खेळाडू आणि ५ ओव्हर्स; भारताचा संघ जाहीर, केदार जाधवला संधी
6
'आत्महत्या म्हटलं की दक्षिणेतील नेत्यांची आठवण येते'; लक्ष्मण हाकेंनी पंकजा मुंडे-धनंजय मुंडेंना काय केली विनंती?
7
दो जिस्म, एक जान... 'बिग बॉस मराठी' फेम निक्की-अरबाझचं रोमँटिक फोटोशूट, पाहा Photos
8
हरियाणाच्या कैथलमध्ये भीषण अपघात; कालव्यात पडली कार, एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू
9
HAL as Maharatna: 'महारत्न' कंपन्यांच्या यादीत आणखी एका कंपनीची एन्ट्री; HAL बनली १४ वी सरकारी कंपनी; पाहा यादी
10
ढुंढो ढुंढो रे... Live मॅचमध्ये चेंडू झुडुपात गेला, ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन जंगलात उतरला अन्... (Video)
11
महाराष्ट्रातील होमगार्ड्सना देशात सर्वाधिक मानधन; दुप्पट रकमेची फडणवीसांकडून घोषणा
12
IND vs NZ Test : टीम इंडियाची घोषणा अन् RCB ला 'विराट' फायदा; फ्रँचायझीला मिळाली सुवर्णसंधी
13
"यावेळी रावणाचे अखेरचं दहन"; डुप्लिकेट मेळावा म्हणत संजय राऊतांची CM शिदेंवर टीका
14
Noel Tata : "मी रतन टाटा आणि टाटा समूहाचा वारसा..," नव्या जबाबदारीनंतर नोएल टाटांची पहिली प्रतिक्रिया
15
पावसाने केलेलं नुकसान, मुलाची अभिनयक्षेत्रात एन्ट्री! 'फुलवंती'च्या दिग्दर्शिका स्नेहल प्रवीण तरडेंनी सांगितलं महिला दिग्दर्शक कमी असण्याचं कारण
16
नो टेन्शन! डिलीट केलेला WhatsApp मेसेज तुम्हाला वाचायचाय?, 'ही' सोपी ट्रिक करेल मदत
17
"दुर्दैवाने राज ठाकरे महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पाठीशी"; पॉडकास्टवरुन संजय राऊतांचा टोला
18
जामनगरचा नवीन 'राजा' अजय जडेजा; राजघराण्याचा पुढचा वारस ठरला, जाणून घ्या इतिहास
19
ठरलं! हरयाणात १७ ऑक्टोबरला होणार शपथविधी, नायबसिंह सैनी १० वाजता घेणार शपथ
20
इराणच्या न्यूक्लिअर साईट्सवर मोठा सायबर हल्ला! अनुचित घटनेच्या भीतीने जग भयभीत झाले

HSC 12th Result 2022: बारावी परीक्षेत रत्नागिरी राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, यंदाही मुलींचा वरचष्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2022 7:00 PM

जिल्ह्यात शाखानिहाय निकालात व्यवसायिक शाखेचा निकाल सर्वाधिक ९८.७० टक्के लागला.

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च - एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक (बारावी) प्रमाणपत्र परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्याने राज्यात दि्वतीय क्रमांक पटकावला असून जिल्ह्याचा निकाल ९६.३९ टक्के लागला आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा १.८१ टक्क्यांनी अधिक आहे. पुनर्परीक्षार्थींचा निकाल ५७.६६ टक्के इतका लागला आहे.बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील १५४ कनिष्ठ महाविद्यालयांमधील १९,१८३ मुलांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी १९०९१ मुले परीक्षेला बसली. यापैकी मुले ९६५७, तर मुली ९४३४ होत्या. या परीक्षेसाठी मुख्य केंद्रे ३७ आणि १४८ उपकेंद्रे होती. यातून १८,४०२ मुले (९६.३९ टक्के) उत्तीर्ण झाली आहेत. यात मुलांची संख्या ९,२२२, तर मुलींची संख्या ९,१८० इतकी आहे. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.४९ टक्के, तर मुलींचे ९७.३० टक्के इतके आहे. मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा १.८१ टक्क्यांनी अधिक आहे. तसेच ३०० पुनर्परीक्षार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १७३ (५७.६६ टक्के) उत्तीर्ण झाले.जिल्ह्यात शाखानिहाय निकालात व्यवसायिक शाखेचा निकाल सर्वाधिक ९८.७० टक्के लागला. त्याखालोखाल विज्ञान शाखेचा ९८.५२, वाणिज्यचा ९६.६१, कला शाखेचा ९३.१७ आणि टेक्निकल सायन्सचा ४६.१५ टक्के निकाल लागला.या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक त्यांच्या उच्च माध्यमिक शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शुक्रवार, दि. १७ रोजी दुपारी ३ वाजता वितरित करण्यात येणार आहे. त्याबाबतचे परिपत्रक़ स्वतंत्रपणे मंडळाकडून काढले जाणार आहे. पुरवणी परीक्षेसाठीही पुनर्परीक्षार्थी आणि श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार, दि. १० जूनपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात येणार आहेत.गुणपत्रिकेच्या पडताळणीसाठी १० ते २० जून या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे, तर छायाप्रतीसाठी १० ते २९ जून या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घ्यावी लागणार आहे. सर्व विषय घेऊन बसलेल्या व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी-गुण सुधार योजनेअंतर्गत उपलब्ध होतील, असे कोकण विभागीय मंडळाने कळविले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीHSC Exam Resultबारावी निकाल