शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विकासाला माझा विरोध नाही : गीते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 01:08 IST

गुहागर : केंद्रीय मंत्री म्हणून विकासाला माझा कधी विरोध नव्हता व यापुढेही राहणार नाही, असे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी रविवारी आपल्या गुहागर दौºयाप्रसंगी स्पष्टपणे सांगितले. नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत कुणाच्याही वक्तव्यावर भाष्य करण्यापेक्षा प्रत्येकाने आपापली भूमिका पार पाडली तर कोकणाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाही त्यांनी नारायण ...

गुहागर : केंद्रीय मंत्री म्हणून विकासाला माझा कधी विरोध नव्हता व यापुढेही राहणार नाही, असे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी रविवारी आपल्या गुहागर दौºयाप्रसंगी स्पष्टपणे सांगितले. नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत कुणाच्याही वक्तव्यावर भाष्य करण्यापेक्षा प्रत्येकाने आपापली भूमिका पार पाडली तर कोकणाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाही त्यांनी नारायण राणे यांना लगावला.नियोजित रिफायनरी प्रकल्प परिसरात एकाही शासकीय अधिकाºयाला पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे भाष्य केले.रिफायनरी प्रकल्पाबाबत एकूणच भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप केला जातो. एका बाजूला खासदार विनायक राऊत नाणार प्रकल्पाला विरोध करीत आहेत, तर केंद्रीय मंत्री प्रकल्पाचे समर्थन करीत आहे. याबाबत बोलताना गीते म्हणाले की, या प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. त्या परिसरातील जनतेचा विरोध आहे म्हणून शिवसेनेचा याला विरोध आहे. व्यक्तिगत केंद्रीय मंत्री म्हणून विकासाला कधी विरोध नव्हता व भविष्यातही राहणार नाही, असे स्पष्ट केले.विरोधाबाबत तोडगा काढूगुहागर - विजापूर महामार्गाच्या कामाला विरोध केला जात आहे. याबाबत बोलताना आपण सामंजस्याने तोडगा काढू, असे त्यांनी सांगितले.या चौपदरीकरण कामाचा प्रारंभ लवकरच होईल व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत आपणही उपस्थित राहू, असे अनंत गीते यांनी स्पष्ट केले.