शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

जयंत पाटील यांनी माहिती घ्यायला हवी होती, डांबर घोटाळ्याच्या आरोपावरून उदय सामंत यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 2:07 PM

'ताे गैरसमज लवकरच दूर हाेईल'

रत्नागिरी : जयंत पाटील यांनी विधानसभेत बाेलताना त्या कंपनीचे संचालक काेण आहेत, त्यांचे वय काय आहे हे पाहायला हवे होते. त्यांनी प्रश्न उपस्थित केला म्हणून माझ्या मनात आकस नाही. मात्र, त्यांनी आधी माहिती घ्यायला हवी हाेती. ते माहिती घेऊन बाेलले असते तर आनंद वाटला असता, असा टाेला राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी लगावला.राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शनने डांबर घाेटाळा केल्याचे सांगून चाैकशीची मागणी केली आहे. याबाबत मंत्री सामंत यांनी रत्नागिरी येथे पत्रकारांशी बाेलताना आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, जयंत पाटील यांनी ज्या कंपनीचा उल्लेख केला आहे, त्या आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शनचे संचालक माझे वडील आहेत. त्याचे वय आता ८० वर्षे आहे. दुसरी संचालक माझी आई असून, तिचे वय ७९ आहे. जयंत पाटील यांच्यासारख्या अनुभवी नेत्याने चुकीच्या माहितीद्वारे सभागृहात अशा बुजुर्ग मंडळींचा अपमान करणे ही फार शाेकांतिका आहे.जयंत पाटील यांनी जर मला याबाबत विचारले असते तर मी त्यांना माहिती दिली असती. चुकीची कागदपत्र दाखवून ज्या माणसांनी त्यांचा गैरसमज केलेला आहे. ताे गैरसमज लवकरच दूर हाेईल. माझ्या वडिलांनी या जिल्ह्यात शेकडाे ठेकेदार तयार केले आहेत. त्यामुळे ८० टक्के काम त्या कंपनीकडे असण्याचा प्रश्नच येत नाही, असे मंत्री सामंत म्हणाले. जयंत पाटील हे रत्नागिरीचे जावई आहेत, त्यामुळे त्यांचा गैरसमज रत्नागिरीतील काेणत्या महनीय व्यक्तीने करुन दिला याचा मला शाेध घ्यावा लागेल. मात्र, ते माहिती घेऊन बाेलले असते तर आनंद झाला असता, असेही सामंत म्हणाले.

यावेळी छत्रपती संभाजी नगर येथील उद्धवसेनेच्या संकल्प मेळाव्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, हा संकल्प मेळावा नेमका कशासाठी आहे? याबाबत संभ्रमावस्था आहे. काँग्रेसने राज्यात जास्त जागा लढवणार असे बोलून आव्हान दिले आहे. त्याला आव्हान देण्यासाठी हा मेळावा आहे का? असा प्रश्न सामंत यांनी केला आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचे आम्हाला अजिबात टेन्शन नाही. आम्ही विधानसभेला २०० जागा जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीvidhan sabhaविधानसभाJayant Patilजयंत पाटीलUday Samantउदय सामंत